शेतकरी आंदोलनाला हजारे यांचा पाठिंबा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-यापूर्वी महाराष्ट्र सरकार चालले तर चांगले नाहीतर खटारा गाडी असे वक्तव्य अण्णा हजारे यांनी नुकतेच केले होते मात्र केंद्र सरकारबाबत अण्णा हजारे गप्प का आहेत असा सवाल विरोधक करत होते मात्र अण्णा हजारे यांनी चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारलाही फटकारले आहे.

दिल्लीमध्ये चाललेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समर्थन दिले आहे. केंद्र सरकारवर निशाणा साधत अण्णा हजारे म्हणाले, की देशाचे दुर्भाग्य आहे की एवढ्या दिवसापासून शेतकरी आंदोलन करत आहे त्याकडे सरकार लक्ष देत नाही. ते काही पाकिस्तानमध्ये राहत नाही.

आपल्या देशात राहत आहेत. निवडणुकीच्यावेळी शेतकर्‍याच्या दारोदार जाऊन मतदान मागितले जातात मात्र निवडणुकीनंतर शेतकर्‍याचा विचार होत नाही.

शेतकर्‍यांचे आंदोलन हे शांतीच्या मार्गाने चालले आहे देशातला शेतकरी हा देशाचा दुश्मन नाही. आंदोलनाबाबत सरकारने शेतकर्‍यांबरोबर चर्चा करावी, चर्चेतून मार्ग निघेल, चर्चा करून शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवले जाऊ शकतात असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment