शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात ८ तारखेला राज्यातील सर्व बाजार समित्या राहणार बंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात ८ तारखेला राज्यातील सर्व बाजार समित्या बंद राहणार आहेत. अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयदत्त होळकर यांनी दिली.

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याने देशभरातील शेतकरी त्रस्त झाले असून केवळ उद्योगपती धार्जीणे धोरण राबवत आहे. केंद्र सरकारने शेतकरी वर्गाला या मोठ्या उद्योगपतीच्या तालावर नाचविण्यासाठीच हे कायदे आणले असून देशभरातील शेतकरी संतप्त झाला आहे, अशी माहीती होळकर यांनी दिली.

तसेच या आंदोलनाला शेतकरी नेते आणि आणि खासदार शरद पवार यांनी पाठींबा दिल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात ८ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार असल्याची माहितीही जयदत्त होळकर यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment