पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समन्वयातून विकासाला दिशा- आ.विखे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  योजनांच्या अंमलबजावणीत शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे वेगळेपण राज्यात दिसून येते.यासाठी गावपातळीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संघटनेच्या माध्यमातून असलेला समन्वयच विकासाच्या प्रक्रियेला दिशा देणारा ठरत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

कोव्हीडच्या संकटानंतर प्रथमच जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्याची सहविचार सभा माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेत प्रामुख्याने गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांनी गावातील विकास प्रक्रीयेबरोबरच आरोग्य, शिक्षण,

सामाजिक योजनांच्या अंमलबजावणी बाबत केलेल्या महत्वपूर्ण सूचनांवर भाष्य करताना आ.विखे पाटील यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांबरोबरच कोव्हीड संकटात सर्वानी एकत्रित येवून केलेल्या कामाचा आढावा आपल्या भाषणात घेतला. लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी प्रभावी झाल्यामुळेच राहाता पंचायत समितीचा गौरव राज्यपातळीवर झाला.

बाजार समितीने कोवहीड संकटातही आपले व्यवहार सुरळीतपणे सुरू ठेवून शेतकऱ्यांना दिलासा दिला. थेट लिलाव करण्याची पध्दत राज्यात प्रथम आपण सुरू केल्यामुळेच इतरांना त्याचे अनुकरण करावे लागले याकडे लक्ष वेधून आ.विखे यांनी सांगितले की,करोनाचे सकंट आल्यानंतर गावातील कार्यकर्त्यांनी सक्रीयपणे समाजाला आधार दिला.

गावांचे निर्जतूकीकरण करण्यापासून ते गरजू लोकांना अन्नधान्य घरपोच देण्यासाठी घेतलेला पुढाकारामुळे या मोठ्या संकटावर आपण मात करू शकलो. प्रवरा ग्रामीण रुग्णालय, डॉ विखे पाटील हॉस्पिटलची मोठी मदत समाजाला झाली असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

शैक्षणिक संस्थाच बंद राहील्याने विद्यार्थ्यापासून ते संस्थामधील कर्मचाऱ्यांवर आलेल्या संकटाची जाणीव आपल्याला निश्चित आहे. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय करून दिलासा देण्याची ग्वाही देतानाच सर्वच संस्थांमधून सामाजिक बांधिलकी ठेवून काम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एकीकडे काही शैक्षणिक संस्थामध्ये पैसै घेवूनही नौकर्या न देण्याची आणि फसवणूक करण्याची प्रकरण समोर आल्याचे आपण पाहातो. परंतू आपल्याकडे परिसरातीलच युवकांना संधी देवून गुणवतेला प्राधान्य देण्याचे सुरु असलेले काम वेगळेपण दाखवून देत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख आ.विखे पाटील यांनी केला.

गावात सामाजिक एकोपा चांगला राखण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात असलेला चांगला सुंसवादच विकासाची प्रक्रीया पुढे नेण्यासाठी पोषक ठरत असल्यानेच आपल्या मतदारसंघाचे वेगळेपण राज्यात प्रभाव निर्माण करणारे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी आण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले की छोट्या मोठ्या कामातूनच गावातील नेतृत्व तयार होत असते. काम करणा-या कार्यकर्त्याला समाज पाठबळ देत असतो.पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी सामुहीक विकासाच्या प्रक्रियेची सुरू केलेली परंपरा पुढे घेवून जाण्यातच खरे हीत असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी सभापती सौ.नंदाताई तांबे, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर, गणेश कारखान्याचे चेअरमन मुंकूदराव सदाफळ, रामभाऊ भुसाळ, कैलास तांबे, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शहर अध्यक्ष सचिन शिंदे, प्रवरा बँकेचे चेअरमन बाळासाहेब भवर, चेअरमन नंदूशेठ राठी,

ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती उमेश जपे, बाळासाहेब जपे, जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.रोहिणी निघुते, दिनेश बर्डे, पंचायत समितीचे सदस्य संतोष ब्राम्हणे, गुलाबराव सांगळे, सौ.दिपाली डेंगळे शांतीनाथ आहेर, बाळासाहेब आहेर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोट आगामी ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की, या निवडणुका गावपातळीवरच्या असल्याने बिनविरोध कशा होतील यासाठी जेष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यांनी समन्वयाने निर्णय करावेत.

गावपातळीवर निवडणुका पार पाडताना लोकसहभाग सामंजस्य व एकोपा टिकून ठेवावा.निवडणुक संपल्यानंतर त्याचा गावाच्या विकासावर विपरीत परिणाम होतो याची जाणीव ठेवून सहमतीने निवडणुका पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.

Leave a Comment