बाळासाहेब थोरात म्हणाले राजकारणाचा गुंता आम्ही करत नाही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली. चार जागेकरता झालेल्या निवडणुकीत एका जागेकरिता अपेक्षित निकाल आला नाही.

हे दुर्दैवाने घडले. शेतकरी व बँकेच्या हिताकरिता राजकारणविरहित निवडणूक करण्यासाठी आपण पुढाकार घेतला असून बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार आहोत,

असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. जिल्हा सहकारी बँकेच्या निकालानंतर रविवारी महसूलमंत्री थोरात यांनी संगमनेरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची महाराष्ट्रातील आदर्श बँक आहे.

या बँकेच्या माध्यमातून साखर कारखान्यांना कर्जाच्या रुपाने मदत होत असते. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज देण्याचा अभिनव उपक्रम या बँकेने केला आहे. या बँकेचे महत्व अहमदनगर जिल्ह्यासाठी, सहकारासाठी आणि शेतकऱ्यांसाठी अनन्यसाधारण असून या बँकेची निवडणूक राजकारणविरहित केलेली आहे.

साखर कारखानदारी सगळ्यांकडे आहे, ती चांगल्या पद्धतीने चालली तर आर्थिक चलन चांगले फिरते. जिल्ह्यात साखर कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालवण्याची पद्धत आहे.

ही शिस्त आमच्याकडे असून ती आम्हाला टिकवायची आहे. त्यात राजकारणाचा गुंता आम्ही करत नाही, असेही नामदार थोरात म्हणाले.