आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे जनतेला भावनिक आवाहन !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आता वाढत आहे. यात अनेक प्रमुख मंत्री देखील कोरोना बाधित झाले आहेत.यात  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा देखील समावेश आहे.

मात्र ते रूग्णालयात असतानाही राज्यातील जनतेला कोरोना पासून बचाव करण्यासाठी आवाहन केले आहे. ते म्हणतात की ,वर्षभरापासून आपण कोरोना विरुध्दची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना व प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोनायोध्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करु शकलो.

मात्र अद्यापही कोरोना गेलेला नाही. तो पुन्हा डोके वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लढावी लागणार आहे. मी सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाविरुध्द लढतो आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणू माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो,

कोरोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या, परंतु कोरोनाला माझ्या जवळ येणे जमले नाही, पण अखेर त्याने मला गाठलेच. मात्र आपल्या सदभावना, प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा कोरोना विरुध्दच्या सामूहिक लढाईत सहभागी होणार आहे. समजदार, संवेदनशील व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे.

म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला. मात्र आता पुन्हा लॉंकडाऊन परवडणारे नाही. लॉकडाऊन टाळणे केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे. तेव्हा आपण मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन टाळा.

शेवटी स्वत:ची काळजी म्हणजेच कुटुंबातील प्रिय व्यक्तींची काळजी आणि प्रिय व्यक्तींची काळजी म्हणजेच समाजाची काळजी. तेव्हा चला तर हरवूया करोनाला, ‘एकजुटीने, एकमताने, एकनिर्धाराने, असे आवाहन टोपे जनतेला केले आहे.