राज्याअंतर्गाच्या स्पर्धेत शेवगावच्या शेतकरी पठ्याची दमदार कामगिरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- कृषिप्रधान देश असलेल्या भारतात आजही अनेक जण नापीक जमिनीला कंटाळून आत्महत्या करतात. तर काहीजण याच उजाड जमिनीत देखील आपल्या मेहनतीने सोने पिकवण्याची धमक बाळगतात.

व अशाच शेतकऱ्यांमुळे आपला देश अन्न धान्यात अग्रेसर राहतो. यातच नगर जिल्ह्यासाठी एक कौतुकास्पद गोष्ट घडली आहे. राज्य शासनाच्या पीक स्पर्धेत शेवगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी आबासाहेब निवृत्ती वावरे

यांनी जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक, तर महेश चंद्रकांत म्हस्के यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते.

अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ व्हावी या उद्देशाने राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात आली.

या स्पर्धेत शेवगाव तालुक्यातील वरूर येथील प्रगतशील शेतकरी आबासाहेब वावरे यांनी सहभाग घेत रब्बी हंगामात आपल्या चार एकर शेतात हरभरा पीक घेतले. व योग्य व्यवस्थापन करत हेक्टरी ३१ क्विंटल उत्पन्न मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

दरम्यान शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मदतीने विविध प्रयोग शेतात राबविल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. कोणत्याही पिकाच्या लागवडीचा / पेरणीचा कालावधी महत्त्वाचा असतो. योग्य नियोजन आणि सल्ला घेतला तर प्रत्येकजण भरघोस उतपादन घेऊ शकतो.