मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय ! लसींचा पुरवठा …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- देशातून कोरोनाची दुसरी लाट बहुतांश प्रमाणात ओसरताना दिसत असली, तरी काही राज्यांत वाढणारी रुग्णसंख्या चिंता वाढवणारी ठरत आहे.

यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण हाच उत्तम पर्याय असल्याचे सांगितले जात असले, तरी लसींचा पुरवठ्यातील अनियमिततेमुळे देशव्यापी लसीकरण मोहिमेत खंड पडत असल्याचे दिसत आहे.

यावरून विरोधकांकडूनही मोदी सरकारवर टीका करण्यात येत असताना, लसींचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्राने महत्त्वाचा निर्णय घेण्याची माहिती देण्यात आली आहे.

खासगी रुग्णालयांना लसींचा कोटा कमी करण्याच्या सरकारच्या योजनेवर राज्यसभेत भाजप खासदार सुशील कुमार मोदींच्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांचा न वापरलेल्या लसी परत घेतल्या जात आहेत.

आता लस तयार करणाऱ्या कंपन्यांना खासगी क्षेत्रासाठी 25 टक्के लस राखीव ठेवण्याची गरज भासणार नाही आणि त्यांना आवश्यकतेनुसार लस पुरवली जाणार असून, उर्वरित लस थेट सरकारला दिली जाईल. त्यामुळे लसीकरणाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.