मिरवणूक दरम्यान गोंधळ घालणार्‍या तरुणांवर पोलिसांकडून सौम्य लाठीमार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत समजावून सांगूनही काही तरुणांनी एका चौकात गोंधळ घातल्याचा प्रकार श्रीरामपूर मध्ये नुकताच घडला होता.

अखेर नाईलाजाने पोलिसांनी या तरुणांना हुसकावून लावण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, छत्रपती शिवाजी महाराज रोडवरून सय्यद बाबा चौक याठिकाणी घोडा मिरवणूक काढण्यात आली होती.

मिरवणूक झाल्यानंतर फक्त घोडा व तीनचार कार्यकर्ते परत येतील असे पोलिसांनी सांगितले होते. परंतु पुन्हा 16 ते 18 वयोगटातील काही तरुण घोडा मिरवणूक काढण्याच्या पवित्र्यात होते.

सदर मिरवणूक एका चौकात येताच समजावून सांगूनही या तरुणांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी या तरुणांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.

मात्र काही तरुण जास्तच गोंधळ घालत असताना पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान या घटनेची माहिती कळताच काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

यावेळी दोन्ही समाजातील लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून कार्यक्रम शांततेत पार पाडावेत, कोणताही गोंधळ घालू नये, गोंधळ घालणार्‍यांविरुध्द पोलीस कारवाई करतील असा इशारा यावेळी दिला.