अहमदनगर ब्रेकिंग : आ.पाचपुते यांच्या जवळच्या माणसांनी आखला ‘तो’ कट ..?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्याचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना राजकारणतुन संपविण्याचा घाट त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांनी घातला आहे. असा खळबळजनक दावा आ.पाचपुते यांचे पुतणे, काष्टी गावाचे सरपंच साजन पाचपुते यांनी केला आहे.

नुकत्याच झालेल्या उपसरपंच निवडीनंतर आ. पाचपुते गटाच्या १० सदस्यांनी उगारलेल्या राजीनामा नाट्यावर एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले त्या सदस्यांनी राजीनामा देण्याआगोदर ज्या जनतेनी निवडून दिले होते त्या जनतेला देखील विश्वासात घेणे गरजेचे असल्याची खंत व्यक्त केली.

नुकत्याच झालेल्या काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रताप सिंह पाचपुते यांचा साजन यांनी पराभव केल्या नंतर आ. पाचपुते गटाला दहा सदस्यांचे बहुमत असताना उपसरपंच निवडीत त्यांच्या गटाचे एक मत फुटल्याने झालेला पराभव जिव्हारी लागून, त्यांच्या गटातील निवडून आलेल्या दहा सदस्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले.

या पार्श्वभूमीवर बोलताना सरपंच साजन पाचपुते यांनी सांगितले की,या राजीनामा नाट्य प्रकरणात माजी मंत्री आ. पाचपुते यांचा अथवा त्यांच्या घरातील कोणाचा काहीच संबंध नसून आ.पाचपुते यांचे राजकारण संपविण्यासाठी त्यांच्या जवळच्या काही लोकांनी या दहा सदस्यांना राजीनाम्याचे पाऊल उचलायला भाग पाडले आहे.

आ.पाचपुते गटाच्या दहा सदस्यांनी राजीनामे दिले असून राजीनामे देण्या आगोदर त्यांनी जनतेला विश्वासात घेऊन हा निर्णय गरजेचे होते. आ. पाचपुते यांचे उपसरपंच पदासाठी बहुमत असताना त्यांच्यातील एक सदस्य फुटल्याने आमच्या गटाचा सदस्य उपसरपंच झाल्याने नाराज होऊन त्यांनी राजीनामे दिले असून राजीनामे द्यायचे होते तर उपसरपंच निवडीआगोदर त्यांनी राजीनामे द्यायला पाहिजे होते.

असे सांगत या दहा सदस्यांनी हा निर्णय आ.पाचपुते यांच्या दोन नंबर फळीतील घातकी कार्यकर्त्यांच्या दबावाला बळी पडून घेतला असल्याचे यातून हे सिद्ध होतं असून या दोन नंबर फळीतील कार्यकर्त्यांना विकासापेक्षा सत्ता महत्त्वाची वाटत आहे.

तरी राजीनामे देऊन सहनभुती मिळणार असे वाटत असेल तर तसे काही होणार नाही. राजीनामा दिलेल्या पैकी निम्म्या लोकांनी राजीनामा स्वीकारू नये यासाठी दुसऱ्या दिवसापासून फोन सुरू केले असल्याचे देखील ते म्हणाले.