अहमदनगर :- भाजपने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त घोषणा करून त्यांची चेष्टा केली. त्यांना सन्मानाने जगण्यासाठी कधी शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाही.
शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी दिली. पण अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीस लावले, अशी भावना राष्ट्रवादीत आलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरमध्ये नगर, श्रीगोंदे, जामखेड व कर्जत तालुक्यांमधील प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
शेतकऱ्यांचे खरे सरकार येण्यासाठी राष्ट्रवादीत दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले. अंजना पवार, महेश जगताप, संदीप सुरवसे, संतोष कोकाटे, शारदा ठोंबरे, कमला माळी, शंकर पवार, हाजी इम्रान युसूफ, शहाजी गोरे, दिलीप कांकरिया हे राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले.
- अहमदनगर : तब्बल 2 महिन्यांपासून शहरातील ‘या’ भागात वावरणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला, वनविभागाला मोठे यश
- काळजी वाढवणारी बातमी ! पंजाबराव डख म्हणतात महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील 3 दिवस जोरदार पाऊस हजेरी लावणार
- अहमदनगर लोकसभा : कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाला लीड मिळणार ? आमदार आपापले गड राखणार का ?
- केवळ मोदीच! डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोदीपर्वातील कामांची मांडली जंत्री
- Mumbai Bharti 2024 : मुंबईत नोकरीचा गोल्डन चान्स! सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन अंतर्गत या पदांसाठी निघाली भरती