प्रतिकूल परिस्थितीतून जडण-घडण झाल्यानेच संवेदनशील अभिनय आणि सामाजिक कार्य करू शकलो -मकरंद अनासपुरे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर: प्रतिकूल परिस्थिती माझी जडण-घडण झाली. त्यातूनच माझ्यातील संवेदनशील मानून घडला. यामुळेच मी चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न करू शकलो. नाम फौंडेशनच्या माध्यमातून केलेलं काम करण्याची प्रेरणा पण याच संवेदनशीलतेतून मिळाल्याची भावना सुप्रसिद्ध अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यक्त केली. थिंक ग्लोबल फौंडेशनच्या स्व. अमरापूरकर पुरस्काराला उत्त्तर देताना आयोजित प्रकट मुलाखतीच्या वेळी ते बोलत होते.

चंद्रकांत कुलकर्णी यांनी ‘काय द्याच बोला’ या चित्रपटात मला हिरो म्हणून पहिल्यांदा संधी दिली. त्यामुळेच मला प्रेक्षकांनी नायक म्हणून स्वीकारलं आणि पुढे अनेक संधी मिळत गेल्या. मला मिळालेला अमरापूरकर पुरस्कार हा माझ्या एकट्याचा पुरस्कार नाही. कारण मला घडविण्यामध्ये अनेकांचं योगदान आहे. एक गाव सावरखेड या चित्रपटात मला स्व. सदाशिव तात्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली होती हे मी माझ भाग्य समजतो.

अभिनय आणि सामाजिक कार्य विभागातून अनासपुरे यांना रु. ५१०००, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आले. प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी गायकवाड आणि राज्याचे साखर तथा कृषी आयुक्त शेखर गायकवाड या दोन सनदी अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हिवाळी अधिवेशनामुळे उपस्थित राहू न शकलेल्या गायकवाड यांच्या वतीने त्यांच्या पत्नी वंदना गायकवाड यांनी पुरस्कार स्वीकारला. सुप्रसिद्ध सिने-नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते पुरस्कार्थींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते.

दिग्दर्शक कुलकर्णी यावेळी बोलताना म्हणाले कि अनासपुरे आणि मी एकाच भागातले आहोत. त्यांचा संघर्ष मी जवळून पाहिला आहे. ते फक्त विनोदी नट नाहीत तर एक उत्तम अभिनेते आहेत. अभिनयाच्या पलीकडे जाऊन त्यांनी नाना पाटेकर यांच्या बरोबर एकत्रितपणे नाम फौंडेशनच्या माध्यमातून तो आला त्या मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांचा आधारवड होण्याच काम त्यांनी केल. त्याचं हे योगदान वाखाणण्या जोग आहे.

पुरस्काराला उत्तर देताना आयुक्त सोळंकी म्हणाले कि, आपण स्वतःतील गुण ओळखले पाहिजेत. त्यांचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी केला पाहिजे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. यातून मला भविष्यात शिक्षण क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी कायम प्रेरणा मिळत राहील.

अनासपुरे, कुलकर्णी यांच्या सह सर्वच मान्यवरांनी किरण काळे यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. प्रास्ताविक फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी केले.प्रसाद बेडेकर यांनी मकरंद अनासौरे यांची प्रकट मुलाखत घेतली. स्वागत प्राचार्य बी.एच. झावरे यांनी केले

यावेळी जिल्हा मराठा संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, अॅड. विश्वासराव आठरे पाटील, अॅड. दीपलक्ष्मी म्हसे पाटील, सीताराम खिलारी, प्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.झावरे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव काळे, श्रीराम पिंगळे, शेखर देशमुख, अमोल खोले, दिलीप पुंड, रमाकांत काठमोरे आदी उपस्थित होते.

…आणि हशा पिकला

किरण काळे यांनी दिग्दर्शक कुलकर्णी यांच्या आजचा दिवस माझा या चित्रपटातले मुख्यमंत्री कसे संवेदनशील दाखवले आहेत आणि आय.ए.एस. अधिकारी कसे चांगल्या पायात आडवा पाय टाकतात हे दाखविल्याचे सांगितले. पण सोळंकी आणि गायकवाड हे चांगल्या कामांची वाकडी फाईल सरळ करणारे अधिकारी असल्याचे सांगितले आणि हशा पिकला.

कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात मागील महिनाभर राज्यात घडलेल्या सत्ता नाट्यावर एक नाही तर चांगले चार-पाच चित्रपट मी काढू शकेल असा उपरोधिक टोला महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर लगावला. माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी कुलकर्णी यांच्यावर कोटी करीत तुम्ही किती पण चित्रपट काढा पण राजकारणी बधीर झालेले आहेत. त्यांच्यात तरी सुद्धा तसू भरही फरक पडणार नाही असे म्हणताच सभागृहात एकाच हशा पिकला. यावेळी तरुणांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment