Google : अरे वा….! गूगल शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी देणार 10 लाख डॉलरचे अनुदान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Google : भारत हा कृषिप्रधान देश म्हणून जगात ख्यातीप्राप्त आहे. देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित असल्याने आपल्याकडे शेतीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. दरम्यान आता शेती व्यवसायात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा समावेश होऊ लागला आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी बांधव शेती व शेतीपूरक व्यवसायातून अधिकची कमाई करत आहेत.

यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारत आहे. मात्र असे असले तरी अजूनही आधुनिक तंत्रज्ञान आपल्या देशात तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. काही सामाजिक संस्था तसेच शेतकरी संघटना शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाबाबत अवगत करत आहेत.

तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा देखील मोठा प्रभावी वापर होत आहे. सर्वच स्तरावरून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न होत असतानाच गुगलकडून एक चांगली बातमी आली आहे. गुगल कृषी क्षेत्रात कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी दहा लाख डॉलर्सचे अनुदान देणार आहे.

यामुळे शेती व्यवसायाचे रुपडे बदलणार आहे. या अनुदानाच्या जोरावर कृत्रिम तंत्रज्ञानाचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढणार असून यामुळे शेतकरी बांधवांना हवामानाची तसेच शेती बद्दल अचूक अशी माहिती मिळू शकणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराने हवामान कधी चांगले राहील, कधी खराब राहील तसेच पिकाबाबत आणि शेतीशी निगडित इतर महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे शेती करताना सोयीचे होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

हवामानात होत असलेल्या बदलामुळे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान होते ते यामुळे कमी होणार आहे. दरम्यान या आधी देखील गुगलने आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाढवण्यासाठी 2019 मध्ये वीस लाख डॉलरची मदत दिली होती. आता नव्याने दहा लाख डॉलर दिले असल्याने याचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कृषी क्षेत्रात वापर वाढवण्यासाठी फायदा होईल, साहजिकच यामुळे शेतीला आणि शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आर्टिफिशल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाद्वारे मशीनला माहिती समजणे, त्याचं विश्लेषण करणे आणि अनुमान काढणे सोपे होईल. आता या तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर केला जाणार आहे.

त्यामुळं शेती क्षेत्राला याचा फायदा होणार आहे. शेतकरी बांधवांना शेती करताना सर्वाधिक निसर्गाचा लहरीपणाचा फटका बसतो. कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी, कधी दुष्काळ यांसारख्या नानाविध अडचणींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. मात्र या हवामानात होणाऱ्या बदलाची शेतकऱ्यांना आधीच माहिती मिळाली तर त्यांना योग्य त्या उपाययोजना करता येणे शक्य होणार आहे.

म्हणजेच हवामानाची अगोदरच शेतकऱ्यांना जर अचूक माहिती मिळाली तर शेतकऱ्यांना शेतीतून अधिक उत्पादन मिळवता येणार आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या कामी मोठी मदत करणार आहे. यामुळे गुगलचे हे अनुदान शेती व्यवसायाचे रुपडं बदलण्यासाठी कारगर सिद्ध होणार आहे.