Monsoon Update: पंजाबरावांचा मान्सून अंदाज..! राज्यात पावसाचं तांडव कायम; आता ‘या’ तारखेलाचा होणारं सूर्यदर्शन, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update: सध्या सर्वत्र जोरदार पाऊस (Monsoon) सुरू आहे. पावसाचा (Rain) जोर राज्यात पूर्वीपासून दक्षिणेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्वत्र बघायला मिळत आहे. यामुळे राज्यात जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील अर्धशक्तिपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर काल ढगफुटी सदृश्य पाऊस (Monsoon News) झाला यामुळे गडावरील दगड-गोटे दर्शन रांगेत आले, परिणामी दर्शनासाठी आलेल्या 4-5 भाविकांना दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील हरणबारी धरण ओसंडून वाहत आहे. यामुळे चार-पाच दिवसांपूर्वी निम्म्याहून अधिक खाली असलेले धरण आता ओव्हर-फ्लो होऊ लागल्याने पावसाची तीव्रता किती असेल हे आपल्याला समजते.

हरणबारी धरण फुल भरलं असल्याने आता धरणातून पाण्याचा विसर्ग होणार आहे. अशा परिस्थितीत मोसम नदीकिनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकिनारी असलेल्या लोकांनी वेळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे आवाहन देखील नदीकिनारी वसलेल्या गावात केले जात आहे.

अशीच परिस्थिती गिरणा काठी असलेल्या गावांची देखील आहे. यामुळे राज्यात सर्वत्र धुमाकूळ घालणारा पावसाची तीव्रता नाशिकात अधिक असून अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती बघायला मिळत आहे. सध्या राज्यातील जनता पाऊस उघडण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाची आतुरतेने वाट पाहणारा बळीराजा देखील सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धास्तावून गेला आहे. अशा परिस्थितीत आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असणारी व्यक्ती म्हणजेच परभणी भूमीपुत्र हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आपला मान्सून अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) सार्वजनिक केला असून राज्यात सूर्यदर्शन केव्हा होईल याची तारीख देखील डिक्लेअर केलेली आहे.

हवामान तज्ञ पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांच्या मते, हवामानात अचानक बदल झाल्यामुळे 12 तारखेपासून 14 तारखेपर्यंत राज्यात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. म्हणजेच सध्या सुरू असलेला पाऊस 14 तारखेपर्यंत उघडणार नसल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे.

यामुळे शेतकरी बांधवांची काळजाची धडधड वाढली असून खरिपात पेरलेल्या पिकांची नासाडी होणार असल्याचे शेतकरी बांधव नमूद करत आहेत. आधी पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागते की काय अशी परिस्थिती शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभी राहिली होती. मात्र आता जास्त पावसामुळे दुबार पेरणी करावी लागते की काय अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

पंजाबराव यांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार(Panjab Dakh Weather Report), 12 ते 14 जुलै दरम्यान, राज्यात कोकण किनारपट्टी, मुंबई, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ सर्वत्र जोरदार पाऊस कोसळणार आहे. पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी सांगितले की, राज्याला आता सूर्याचे दर्शन 15 तारखेलाचं होणार आहे. निश्चितच सूर्यदेवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या जनतेसाठी अजून काही काळ पावसाच्या विक्राळ रूपाचा सामना करावा लागणार आहे.