Bharat Jodo Yatra : एअर इंडियाची नोकरी सोडून अतिषाचा भारत जोडो यात्रेत सहभाग; मुलीची होतेय सर्वत्र चर्चा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bharat Jodo Yatra : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण भारतभर भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. राहुल गांधी यांच्या या यंत्राला सर्वत्रच चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या यात्रेमध्ये एका मुलीची चांगलीच चर्चा होत आहे. मोकारीवर पाणी सोडून या मुलीने राहुल गांधी यांना पाठिंबा देत भारत जोडो यात्रेत सहभागी झाली आहे.

अतिषा पैठणकर (वय 28) ही गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीसाठी धडपडत होती. अनेक प्रयत्नांनंतर तिला नोकरी मिळाली, पण त्याचवेळी तिच्यासमोर आणखी एक प्रश्न उभा राहिला. अतिषाला ऑफिसमध्ये रुजू होण्याची तारीख आणि त्याच दिवसापासून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा यापैकी एक निवडायची होती.

इलेक्ट्रॉनिक दूरसंचार अभियंता अतिषा यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची निवड केली. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातील नांदेडमध्ये आहे. या यात्रेत काँग्रेसचे 140 सदस्य आणि काँग्रेस नेते सहभागी झाले आहेत.

तर, राहुल गांधींसोबत महाराष्ट्रातील काँग्रेसचे नऊ नेते भारत जोडीमध्ये सहभागी झाले आहेत. यासोबतच भारत-जोरो यात्रेसाठी महाराष्ट्रातून २ हजार लोकांची निवड करण्यात आली आहे.

कॉलेजच्या दिवसांपासून मला काँग्रेसच्या विचारसरणीने आकर्षित केले आहे, असे अतिषाने म्हटले आहे. माजी खासदार प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठीही आम्ही मुंबईत गेलो होतो. अतिषा सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्याची मुलगी आहे.

राजकारणात प्रवेश करणारी आतिषा तिच्या कुटुंबातील पहिली सदस्य आहे. दोन वर्षांपूर्वी अतिषा यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता त्या भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव आहेत.

आतिषाने २०१५ मध्ये पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली. मी गेल्या तीन वर्षांपासून नोकरीच्या शोधात आहे. अपेक्षेप्रमाणे काम मिळत नव्हते. नंतर एअर इंडियात नोकरी मिळाली आणि ऑफर लेटरही आले.

मात्र, भारत जोडो यात्रेची तारीख आणि नोकरीवर हजर होण्याची तारीख दोन्ही सारखीच होती. मला दोघांपैकी एकाची निवड करायची होती. ते खूप कठीण होते. पण मी भारत जोडो यात्रा निवडली. माझ्या घरच्यांनीही मला साथ दिली.

अतिषाने नोकरीवर पाणी सोडून भारत जोडो यात्रेत सहभाग घेऊन राहुल गांधींच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला असून बोलून काहीही होणार नसून कृती करायची म्हणून हा निर्णय घेतल्याचे अतिषाचे म्हणणे आहे.

कन्याकुमारीपासून अतिषा ही भारत जोडो यात्रेत सहभागी झाली असून अतिषाच्या पायाला फोड सुद्धा आले होते, यात्रेत अनेकांच्या समस्या आणि युवा वर्गाशी संवाद साधता आल्याने ही शिदोरी आयुष्यभरासाठी महत्वाची ठरणार असल्याचे अतिषा सांगतेय.