अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- शेतजमिनीशी संबंधित अतिशय महत्त्वपूर्ण दस्तावेज म्हणजे सातबारा (7-12). शेतजमिनीचा आकार, त्याचा मालकी हक्क तसेच इतर सर्व गोष्टींची माहिती सातबाऱ्यावर दिलेली असते.
मात्र याबाबत एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वाढते शहरीकरण आणि मोठ्या शहरांत शेतजमीनच शिल्लक राहिली नसल्याने सातबारा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हे झाले आहे आणि सातबारा उतारादेखील सुरू आहे, अशा शहरांमध्ये सातबारा उतारा बंद करून त्याठिकाणी केवळ प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.
सातबाऱ्यांचे प्रॉपर्टी कार्डमध्ये रुपांतर झाले असतानाही कर आणि इतर लाभ घेण्यासाठी सात बारा कायम ठेवला जातो. त्यामुळे फसवणुकीसारखे प्रकार घडतात.
त्यामुळे सर्व शहरांतील सात बारा बंद करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. या निर्णयाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्याची सुरुवात पुण्यातील हवेली तालुक्यासोबत सांगली , मिरज, नाशिकपासून होणार आहे.
हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो राज्यभरात राबवण्यात येईल. सिटी सर्व्हे झाला असल्यास सातबारा उतारा हा मालमत्तेचा अभिलेख बंद होणे आवश्यक आहे. तरी सुद्धा सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड असे दोन्ही अधिकार अभिलेख सुरू आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम