‘त्या’ रस्त्याचे भूसंपादन १५ ऑगस्टपर्यत पूर्ण करा खासदार विखे यांच अधिकाऱ्यांना सुचना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  नगर करमाळा हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, चौपदरीकरण झाल्यामुळे तेथे अपघात होणार नाहीत, तसेच कर्जतच्या विकासाला चालना मिळेल. शेतकऱ्यांना विश्वासात घेवून या रस्त्याचे भूसंपादन १५ ऑगस्टपर्यत पूर्ण करा.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली व केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे होत असून आगामी काळात दळणवळणच्या सुविधा उपलब्ध होत सर्वांगिण विकास साधला जाईल, असे मत खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

कर्जत येथे नगर करमाळा राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादन, कर्जत नगर आणि आढळगाव ते जामखेड रस्त्याच्या कामाचा आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी खा.विखे म्हणाले की, नगर करमाळा महामार्गाच्या भूसंपादनाचे काम रखडले असून त्यासाठी केंद्र सरकारने अडीचशे कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे.

नगर सोलापूर मार्गावरील भू संपादन नोटीस लवकरात लवकर काढणे व कर्जत वालवड घोगरगाव मार्गे नगर रस्त्याच्या कामात दिरंगाईबद्दल वेळप्रसंगी संबंधित ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्याबाबत झालेल्या मागणीवर एकमत झाले.

तसेच आढळगाव जामखेड रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल असे आश्वासन खा.विखे यांनी दिले.