कोल्हे गटाने केवळ सत्ता नाही म्हणून साडेचार वर्षे किळसवाणे राजकारण केले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- नगराध्यक्ष व आमदार पद ताब्यातून गेल्याचे दुःख अजूनही विसरू न शकलेल्या कोल्हे गटाने आज कहरच केला.

शहरातील महत्त्वाचे रस्ते व विकासकामे होऊ नयेत म्हणून वारंवार अडथळे आणणाऱ्या कोल्हे गटाच्या उपनगराध्यक्षाने संजीवनीचे दूत सोबत घेऊन कोपरगाव पोलिस स्टेशनमध्ये जाऊन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे लेखी पत्र दिले.

मुख्याधिकारी सरोदे यांनी विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित राहून १४४ कलम भंग केला म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणाऱ्या कोल्हे गटाने केवळ सत्ता नाही म्हणून साडेचार वर्षे किळसवाणे डावपेच केले, अशी टीका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली.

मान्सूनपूर्व कामे करायला परवानगी असल्याने नगराध्यक्ष म्हणून मी व तालुक्याचे आमदार यांना व स्थानिक नगरसेवकांना कार्यक्रमाला बोलावले. अधिकाऱ्यांनाही बोलावले. त्याठिकाणी काही स्थानिक रहिवाशीही आले.

कोल्हे यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी माझ्याविरुद्ध तक्रार करावी. विकासकामे करताना मुख्याधिकारी मला सहकार्य करतात म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी असा पोरकटपणा सुरू आहे.

मागील महिन्यात संजीवनी कोविड सेंटरच्या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना बोलावून प्रचंड गर्दी जमवून स्वतःचा उदोउदो करून घेणाऱ्या कोल्हे टोळीविरुद्ध १४४ कलम भंगाचा गुन्हा का दाखल होत नाही? सार्वजनिक हिताचे उपक्रम करतांना तरी कुणीही राजकारण करू नये.

जिल्हाधिकारी यांनी २८ विकासकामे मार्गी लावण्यासाठी हिरवा कंदील दिल्यानंतर मी कोल्हे गटाच्या नगरसेवकांना पत्र दिले कि, आता २८ कामांचा निर्णय झाला. आतातरी तुमच्या प्रभागातील विकासकामे करायची कि नाही, हे लेखी कळवा.

नगरसेवकांना मी ५ एप्रिल रोजी यासंदर्भात पत्र दिले. राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष नगरसेवकांनी कामे सुरू करा, असे लेखी कळवले. पण कोल्हे गटाचे अनेक नगरसेवक मला येऊन भेटून सांगतात की, कोल्हे यांच्या आदेशाशिवाय आम्ही असे पत्र देऊ शकत नाही.

मंजूर झालेली कामेही होऊ द्यायची नाहीत, त्यामुळे प्रभागातील नागरिकांना असे वाटते की नगराध्यक्षच कामे होऊ देत नाहीत, अशी टीकाही नगराध्यक्ष वहाडणे यांनी केली.