शनि दोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रासंदर्भात आहेत ‘हे’ 4 प्रभावी उपाय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :-  ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीवर सर्व नऊ ग्रहांचा प्रभाव असतो. तज्ञांचे म्हणणे आहे की कुंडलीच्या अभ्यासात सुमारे 9 ग्रह आणि 12 राशींचा समावेश आहे.

शास्त्रांमध्ये असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये एखाद्या ग्रहाची दशा कमजोर झाली तर त्यांना जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जाणकारांच्या मते, सर्व ग्रहांमध्ये शनिदेवाला विशेष स्थान प्राप्त आहे.

शनि महाराजांना न्यायाचे दैवत मानले जाते. शनीच्या मजबूत स्थितीमुळे लोकांना सर्व प्रकारचे सुख मिळते. अशी एक म्हण आहे की ज्याच्यावर शनीची वाईट नजर असेल त्याचा नाश निश्चित आहे.

त्याचबरोबर ज्योतिषांच्या मते, ज्या लोकांच्या कुंडलीत शनिदोष आहे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि ज्या ठिकाणी बसला असेल, तेथून एखाद्याला हानी पोहोचत असेल तर त्याला शनि दोष असे म्हणतात.

असे म्हटले जाते की श्रीमंतांपेक्षा श्रीमंत देखील शनि दोषातून सुटू शकत नाही, त्याची सर्व संपत्ती, सन्मान आणि प्रतिष्ठा नष्ट होते. हा दोष टाळण्यासाठी लोक विविध उपायांचा अवलंब करतात. तज्ञांच्या मते वास्तुशी संबंधित उपाय करून शनी दोषाचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. काही सोपे उपाय जाणून घेऊयात-

काटेरी झाडे घरापासून दूर ठेवा :- वास्तुशास्त्राचे तज्ञ सुचवतात की जे लोक शनि दोषाने त्रस्त आहेत त्यांनी त्यांच्या घरात कोणत्याही प्रकारची काटेरी झाडे लावू नयेत. असे मानले जाते की काटेरी वनस्पतींच्या प्रभावाखाली शनि हिंसक, क्रूर आणि बलवान होतो.

 कपडे खरेदी करणे टाळा :- या शास्त्रात असे म्हटले आहे की, शनिदोष टाळण्यासाठी लोकांनी शनिवारी नवीन कपडे खरेदी करणे टाळावे. असे मानले जाते की या दिवशी नवीन कपडे खरेदी करणे शुभ नाही.

– कपडे दान करणे फायदेशीर ठरू शकते: वास्तुशास्त्रात असे मानले जाते की शनी महाराज गरजू आणि गरीबांना कपडे दान करूनही प्रसन्न होतात. तसेच शनिदोषाचा प्रभावही कमी होत असतो.

– तुळशीची झाडे लावणं : तज्ञांचे म्हणणे आहे की तुळशीचे रोप घरात ठेवल्याने शनीचे चुकीचे परिणाम दूर होण्यास फायदा होईल. असे म्हटले जाते की तुळशीचा रोप घराच्या मुख्य दाराकडे म्हणजेच ईशान्य दिशेने ठेवल्यास शुभ परिणाम मिळू शकतात.