उस्मानाबाद : एकीकडे राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्रित लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतात, मात्र दुसरीकडे भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचं समजतं.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सर्व जागांची चाचपणी सुरु केल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने २८८ विधानसभा मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघातही भाजपच्या मुलाखती पार पडत आहेत.
शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघात भाजपकडून पाच ते दहा जण ईच्छुक असल्याचं कळतं. विशेष म्हणजे भाजपने प्रत्येक इच्छुकांचे अर्ज भरुन घेतले आहेत. भाजप शिवसेनेमधील चर्चेत ५० – ५० चा फॉर्म्युला रहबातल झाल्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी नागपुरात दिले होते.
युतीच्या जागावाटपावर २०१४ ला जिंकलेल्या जागांवर चर्चा होणार नाही, चर्चा फक्त सीटिंग व्यतिरिक्त उर्वरित जागांवर केली जाईल, असं पाटील म्हणाले होते. चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
विधानसभेच्या जागांविषयी बोलताना ते म्हणाले की, युतीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला मी, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह मिळवून ठरवू. परंतु आता भाजपने सर्वच २८८ मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्याने, निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
- Traffic Rule: तुम्हाला माहित आहेत का ‘हे’ तीन महत्त्वाचे वाहतुकीचे नियम? यामध्ये तुम्हाला पोलीस नाही देऊ शकत त्रास
- शरद पवारांना दिलेला शब्द पाळणार, आ. नीलेश लंके दुपारी राजीनामा देणार !
- ‘या’ चार कारणांसाठी आता करता येणार 1 ते 2 गुंठे जमिनीची खरेदी विक्री! वाचा सरकारने तुकडेबंदी कायद्यात काय केली सुधारणा?
- 7th Pay Commission: 30 मार्च राहील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा आनंदाचा दिवस! कारण……
- Vehicle Tool Kit: तुमच्या कारसाठी घ्या स्वस्तात मस्त असलेली ‘ही’ टूल किट! गॅरेजवर जाण्याची नाही पडणार गरज