Maharashtra Weather Forecast: सावध राहा .. राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये हवामानाचे स्वरूप पुन्हा बदलणार ! मेघगर्जनेसह वादळाचा अलर्ट जारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Forecast: देशात बदलत असणाऱ्या हवामानामुळे अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे तर काही राज्यात उष्णतेची लाट येत आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय हवामानशास्त्र विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज वर्तवला आहे.

त्याच बरोबर राज्यात एप्रिल ते जून दरम्यान कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार आहे यामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे. या दरम्यान, अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे, तीव्र उष्णता असेल. तर एप्रिल महिन्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तापमानाचा पारा सामान्यापेक्षा जास्त राहिल्याने नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे.

हवामान खात्याने ताज्या अंदाजात म्हटले आहे की, 4 एप्रिल (मंगळवार) अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली , गोंदिया, नागपूर आणि 5 एप्रिल (बुधवार) रोजी भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशीम, यवतमाळ येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. IMD ने या ठिकाणांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

5 एप्रिलपर्यंत कोणतेही टेन्शन नाही

ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते 1 एप्रिलपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात ढगाळ किंवा अवकाळी पावसाची शक्यता नाही. ते म्हणाले, काही भागात ढग आले तरी शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. कारण तूर्तास अवकाळी पावसाची शक्यता नाही.

येथे 6 ते 9 एप्रिलपर्यंत पाऊस पडेल

दरम्यान, 6 एप्रिल ते 9 एप्रिल या चार दिवसांत महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह संपूर्ण मराठवाड्यात आणि विदर्भातील बुलढाणा, वर्धा, नागपूर जिल्हे आणि इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

हे पण वाचा :-  Tata Nexon पावरफुल इंजिन आणि जबरदस्त फीचर्ससह ‘या’ दिवशी बाजारात करणार एन्ट्री ! पहा फोटो