मुख्यमंत्र्यांविरोधी वक्तव्यामुळे राणेंना अटक, मात्र पंतप्रधानांना मारण्याची भाषा करणाऱ्या पटोलेंवर कारवाई नाही: विरोधी पक्षनेते फडणवीस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या पंतप्रधानांवर वादग्रस्त वक्तव्यावरुन सध्या मोठा राजकीय वाद निर्माण झालाय. ‘मी मोदीला मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असे नाना पटोलेंनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे कार्यकर्त्यांशी बोलताना म्हंटले होते.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी नाना पटोलेंवर तीव्र शब्दात टिका केली आहे. गोव्या दौऱ्यावर असलेले भाजप नेते देवेंद्र फडवणीस यांनी या प्रकरणावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित करत म्हणाले आहे की, मुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य केलं म्हणून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेंना अटक केली जाते.

पण आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नेते नाना पटोले हे थेट पंतप्रधानांना मारण्याची भाषा करत आहेत, मग त्यांच्याविरोधात पोलीस कारवाई का होत नाहीए? असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला आहे.

तसेच यासंदर्भात पुढे बोलताना फडवणीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा ज्यांनी केली, त्यांच्यावर काहीच कारवाई नाही आणि या अराजकतेवर कारवाईची मागणी करणार्‍या भाजपाच्या लोकप्रतिनिधी-कार्यकर्त्यांना जागोजागी ताब्यात घेण्याची कार्यवाही.

या राज्यात चाललंय तरी काय, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. पोलीस विभाग सिलेक्टिव्ह होतो, त्या राज्याची अधोगती झाल्याशिवाय राहात नाही. मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारीच आहे की देशाच्या पंतप्रधानांना कोणी जीवे मारण्याची धमकी देत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे !

मुख्यमंत्र्यांचे ते कर्तव्यच आहे, उपकार नाहीत असा टोलाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. शारीरिक उंची वाढल्यामुळे बौद्धिक उंची वाढते असे नाही. हे नाना पटोले यांनी दाखवून दिलंय. काँग्रेस नेत्यांच्या मनात मोदींजींबद्दल असूया आहे हे दिसतेय.

पंजाबमध्ये पंतप्रधानांचा ताफा अडवणे, त्यानंतर नाना पटोले यांचे विधान अशा प्रकारचे विचार लोकशाहीला घातक आहेत. अशी टीका फडणवीसांनी केलीय. तर मला एका घटनेचे आश्चर्य वाटते, पण मी समर्थन करीत नाही की आमच्या एका कार्यकर्त्याने मुखमंत्र्यांच्या पत्नीला राबडी देवी म्हटलं तर मध्यरात्री त्याच्या घरी पोलीस जातात आणि नाना पटोले मी पंतप्रधानांना मारू शकतो अशी थेट धकमी देतात आणि त्यांच्या विरुद्ध साधा एफआयआर ही दाखल होत नाही.

आता कायदा माणूस बघून चालेल अशी परिस्थिती आलीय. असेही फडणवीस म्हणाले आहेत. तसेच पुढे नाना पटोले यांच्या गावात मोदी नावाची एकही व्यक्ती नाही, त्यामुळे ते कोणाबद्दल बोलले हे स्पष्ट झाले आहे. आता ते घाबरलेत. चारही बाजूनं टीका सुरू झाल्याने ते पळ काढत आहेत.

पण कितीही पळ काढला तरी त्यांच्या मनातले विष त्यांच्या ओठावर आले आहे. अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केलीय. नाना पटोले यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये ? एखादा माणूस मी मारू शकतो असे म्हणत असेल तर तो गुन्हाच आहे ! आणि तो दाखल झाला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले आहेत.