तुम्ही बेशुद्ध अवस्थेत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला का? राऊतांच्या प्रश्नावर ठाकरेंचं उत्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात राजकीय उलथापालथ झाली. त्यानंतर या बंडखोरीमागे नेमकी काय कारणं? कोण जबाबदार? यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात अनेक आरोप प्रत्यारोप झाले. या बंडानंतर पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखती दिली आहे. यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीमागील कारणे आणि शिवसेनेचा पुढील राजकीय प्रवास यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

उद्धव ठाकरे ते रुग्णालयात बेशुद्धावस्थेत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ही मुलाखत ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली.

तुम्ही रुग्णालयात बेशुद्धावस्थेत असताना तुमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न होत होता, असे म्हणत संजय राऊत यांनी पक्षातील बंडखोरांबाबत विचारणा केली. यावर उद्धव ठाकरेंनी त्या विषयावर बोलू का? असा प्रश्न विचारला. तसेच मला माझ्या त्या अनुभवातून कुठेही सहानुभुती नको आहे, असेही नमूद करत तसा सरकार पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

पक्षप्रमुखाची शस्त्रक्रिया झाल्यावर यांनी पक्षाला सावरण्याची वेळ होती. मात्र, जेव्हा माझी हालचाल होत नव्हती, तेव्हा यांच्या पक्षविरोधी हालचाली वाढल्या होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत असेन. मी त्यांना दोन क्रमांकाचं पद देऊन पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, मी रुग्णालयात असताना त्यांनी विश्वासघात केला, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.

माझे हातपाय हालत नव्हते, बोटं हलत नव्हती. त्यावेळी काही लोक मी बरा व्हावा म्हणून देवासमोर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. देव पाण्यात बुडवून बसलेले आज पक्ष बुडवायला निघाले आहेत. तेव्हा हा आता उभा राहणार नाही, असं पसरवलं जात होतं. तसेच तुझं काय होणार असं बोललं जात होतं, असेही उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत सांगितले.