ब्रेकिंग : ‘या’ तारखेला होणार समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, मुंबई – नागपूर प्रवास फक्त आठ तासात

मुंबई आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण कधी होणार? याची अधिकृत तारीख राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे.

Published on -

Maharashtra Expressway : आज पासून जून महिन्याला सुरुवात झाली असून हा जून महिना राज्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात महाराष्ट्राला एका नव्या एक्सप्रेस वे ची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. खरंतर, गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहे तर काही प्रकल्प लोकार्पणावाचून सर्वसामान्यांसाठी सुरू झालेले नाहीत.

असाच एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग. खरे तर समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून या महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला असून या महामार्गाचा शेवटचा म्हणजेच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा लोकार्पणाअभावी अजून पर्यंत सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल झालेला नाही. मध्यंतरी समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा दोन मे 2025 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्वसामान्यांच्या सेवेत येणार अशी बातमी समोर आली होती. मात्र काही कारणास्तव हा लोकार्पण सोहळा होऊ शकला नाही. पण आता समृद्धी महामार्गाच्या याच शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणाबाबत एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे.

या तारखेला होणार समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा पाच जून 2025 रोजी सर्वसामान्यांसाठी खुला होणार असून या टप्प्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजित आहे. स्वतः महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणाच्या चर्चा होत्या त्या आता थांबणार आहेत आणि हा टप्पा लवकरच सर्वसामान्यांच्या सेवेत येणार असून यामुळे मुंबई ते नाशिक आणि मुंबई ते नागपूर हा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे हा प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने सुरू झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या आठ तासात पूर्ण होणार आहे, आधी मुंबई ते नागपूर या प्रवासासाठी चक्क 16 तासांचा वेळ खर्च करावा लागत असे, पण हा प्रवास समृद्धी महामार्गामुळे आठ तासांवर येणार आहे. हा हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासासाठी गेम चेंजर ठरणार आहे.

डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला पहिला टप्पा!

समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये खुला झाला होता, या टप्प्याचे लोकार्पण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. नंतर 2023 मध्ये या महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे म्हणजेच शिर्डी ते भरवीर या 80 km लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण झाले. मग 2024 मध्ये भरवीर ते इगतपुरी या पंचवीस किलोमीटर लांबीचा टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले आणि आता 5 जून 2025 रोजी या महामार्गाच्या इगतपुरी ते आमने आशा 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण होणार असून या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!