Team India Corona Case :- देशातील सर्वात मोठी बातमी ! टीम इंडियाचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Team India Corona Case :- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सर्व खेळाडू अहमदाबादमध्ये !
टीम इंडियाचे सर्व खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांच्या घरी होते, पण आता सर्व एकदिवसीय मालिकेपूर्वी अहमदाबादमध्ये जमले होते. अशा परिस्थितीत येथे कोरोना चाचणी केल्यानंतर काही खेळाडूंचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

भारतीय संघासाठी हा मोठा झटका आहे, कारण वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला वनडे सामना 6 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. आता या सामन्याला केवळ तीन दिवस शिल्लक आहेत, अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह झाले तर भारतासमोर प्लेइंग-11च्या तयारीचे संकट उभे राहणार आहे.

एकदिवसीय मालिका प्रेक्षकांशिवाय !
भारतीय संघाला ६ फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका सुरू करायची आहे. अहमदाबादमध्ये तीनही एकदिवसीय सामने खेळले जाण्यापूर्वी टीम इंडिया येथे पोहोचली आहे आणि क्वारंटाईनमध्ये आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सर्व एकदिवसीय सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

रोहित शर्मा पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर भारतीय संघाची ही पहिली एकदिवसीय मालिका आहे, परंतु याला आधीच ग्रहण लागले आहे. रोहित शर्मा दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करत आहे

हे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह !

शिखर धवन (Shikhar Dhawan), ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) आणि श्रेयस अय्यरसह (Shreyas Iyer) अन्य काही खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियामध्ये कोरोनाची जी प्रकरणे समोर आली आहेत त्यात खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ दोघांचाही समावेश आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये शिखर धवन, ऋतुराज गायकवाड यांना कोरोना झाल्याची पुष्टी झाली आहे. बाकीच्याबाबत अधिकृत पुष्टीकरणासाठी बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या वक्तव्याची प्रतीक्षा आहे. बीसीसीआयने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी उद्या पुन्हा खेळाडूंची कोविड-19 चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडिया:
एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.

T20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिका: (India v West Indies series)

पहिली वनडे – ६ फेब्रुवारी, अहमदाबाद
दुसरी वनडे – ९ फेब्रुवारी, अहमदाबाद
तिसरी वनडे – १२ फेब्रुवारी, अहमदाबाद

पहिला T20I सामना – 15 फेब्रुवारी, कोलकाता
दुसरा T20I सामना – 18 फेब्रुवारी, कोलकाता
तिसरा T20 सामना – 20 फेब्रुवारी, कोलकाता