अशा परिस्थितीत ऑक्सिजन मेंदूपर्यंत योग्यप्रकारे पोहोचत नाही. यामुळे नैराश्य, अल्झायमर, तणाव यासारख्या अनेक मानसिक समस्या उद्भवू शकतात.
मोबाईलमधून उत्सर्जित होणारे रेडिएशन इतके हानिकारक आहे की, यामुळे डीएनएचे देखील नुकसान होऊ शकते.
याचा परिणाम गर्भवती महिलांच्या, गर्भाच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर देखील होऊ शकतो.
स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे तरुणांमध्ये मेंदूचा कॅन्सर होण्याचा धोका वाढला आहे.
३० ते ३५ वयोगटातील व्यक्तींनी स्मार्टफोनचा अतिवापर केल्यास त्यांना अल्झायमर आणि पार्किन्सन असे मानसिक आजार उद्भवण्याची शक्यता वाढत असल्याचे एका संशोधनात म्हटले आहे.
तेव्हा निरोगी आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी व्यायाम, आहार यासोबतच मोबाईलचा वापरही कमी करणे आज महत्वाचे झाले आहे.