आज आपण देशातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या टॉप पाच कंपन्यांची नावे व त्यांची आर्थिक उलाढाल आपण जाणून घेऊ.
रिलायन्स इंडस्ट्रीजचा निव्वळ नफ्याच्या बाबतीत प्रथम क्रमांक लागतो.
रिलायन्सने गेल्या आर्थिक वर्षात 67,845 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
रिलायन्सनंतर ओएनजीसी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओएनजीसीने गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 40,305.74 कोटी रुपयांचा नफा कमावत टाटा स्टीलला मागे टाकले आहे.
या यादीत टाटा स्टीलचा तिसरा क्रमांक लागतो. गेल्या आर्थिक वर्षात टाटा स्टिलला 33,011.18 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.
चौथा क्रमांक टाट कंसल्टेंसी सर्व्हिसेस टीसीएसचा लागतो आहे.
तर पाचव्या क्रमांकावर भारतीय स्टेट बँक असून, गेल्या आर्थिक वर्षात बँकेला 31,676 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.