रावण हे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर एक बलाढ्य, बुद्धिमान, पण अहंकारी राक्षस राजाचे चित्र उभं राहतं. रामायणातील या महत्त्वाच्या पात्राबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात, पण एक गोष्ट मात्र फारशी कुणाला ठाऊक नाही. एवढा सामर्थ्यवान राजा असूनही रावण कायम एकटाच झोपायचा. पण का? याचं कारण ऐकल्यावर कुणालाही थक्क व्हायला होतं.

रावण हा एक महान तपस्वी, विद्वान आणि शिवभक्त होता. त्याला वेद-शास्त्रांचं प्रचंड ज्ञान होतं. इतकं की भगवान राम यांनीसुद्धा लंकेवर आक्रमण करण्याआधी रावणाला यज्ञासाठी पुजारी म्हणून आमंत्रित केलं होतं.
त्याचं तेज आणि विद्वत्ता इतकी होती की शत्रूसुद्धा त्याचं आदरानं नाव घेत. मात्र, या सगळ्याच्या पाठीमागे एक गोष्ट लपलेली होती, त्याचा प्रचंड अहंकार. याच अहंकारानं त्याला अधःपाताच्या वाटेवर नेलं आणि शेवटी त्याचा विनाश झाला.
रावणाच्या झोपेबाबतचं गूढ
पण त्याच्या झोपण्याच्या सवयीबद्दल जाणून घेतलं, तर ही गोष्ट अगदीच वेगळी वाटते. कथावाचक प्रेम भूषण यांच्या एका कथनानुसार, एक प्रसंग आहे जेव्हा हनुमान लंकेत माता सीतेचा शोध घेत होते. सर्वत्र शोध घेत असताना, ते रावणाच्या महालात पोहोचले. तिथे त्यांनी एक विलक्षण दृश्य पाहिलं. रावण एका विशाल पलंगावर, एकटाच झोपलेला होता आणि इतक्या जोरात घोरत होता की संपूर्ण खोली त्याच्या आवाजानं थरथरत होती.
हनुमानच नव्हे, कोणालाही हे पाहून आश्चर्य वाटलं असतं. लंकेचा राजा, इतक्या दासी, पत्न्या आणि सेवकांच्या घोळक्यात वावरणारा रावण रात्री मात्र एकटा. यामागील कारणही साधं होतं. रावणाचं घोरणं इतकं भीषण आणि कर्कश होतं की त्याच्या जवळ कोणालाच झोपणं शक्य नव्हतं.
रावणाचा हा प्रसंग सांगतो की, शक्ती असो वा विद्वत्ता काही गोष्टी मात्र साध्या, मानवी आणि भावनिक असतात. आणि हेच रावणासारख्या महाकाय व्यक्तिमत्त्वालाही माणसांसारखं बनवतं.