किडनीच्या आजारांपासून तुम्हाला कोसो दूर ठेवेल ‘ही’ फुकटात मिळणारी गोष्ट, नक्की वाचा!

Published on -

किडनी म्हणजे आपल्या शरीरातील फिल्टर यंत्रणा. ही दोन छोटी, पण अतिशय महत्वाची अवयवं रोज आपल्या शरीरातील घाण आणि विषारी घटक बाहेर टाकण्याचं काम न थकता करत असतात. पण कधी कधी आपणच त्यांची काळजी घेणं विसरतो, तेही अशा काळात जेव्हा बाजारात किडनी डिटॉक्ससाठी महागडी औषधं, ड्रिंक आणि फळं यांची भरमार असते. पण विशेष म्हणजे, तुमची किडनी अगदी मोफत आणि नैसर्गिक पद्धतीनेही पूर्णपणे स्वच्छ राहू शकते. त्यासाठी लागते एकच गोष्ट, ती म्हणजे पाणी!

पाणी पिण्याचे फायदे

होय, साधं पाणी! हाच तुमच्या किडनीच्या आरोग्याचा गुपित उपाय आहे. पाणी म्हणजेच जीवन आणि जेव्हा शरीरात पुरेसं पाणी जातं, तेव्हा किडनी व्यवस्थित काम करत राहते. तुम्ही जितकं जास्त स्वच्छ पाणी पिता, तितकं तुमचं शरीर विषमुक्त होतं. किडनीमधील प्रत्येक कोपरा व्यवस्थित स्वच्छ राहतो.

पाणी प्यायल्याने किडनीत साठलेली क्षारं, युरीक अॅसिड आणि इतर घाण मूत्राद्वारे बाहेर टाकली जातात. यामुळे किडनीवर ताण येत नाही आणि अनेक मोठे आजार टाळता येतात. कधीमधी मळमळ, सूज, अपचन किंवा थकवा जाणवत असेल, तर शक्यता आहे की किडनीवर थोडं दडपण आहे. अशावेळी नियमित पाणी पिणं हाच सर्वोत्तम उपाय ठरतो.

दिवसभरात किती पाणी प्यावं?

दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी तरी प्यायलंच पाहिजे. मात्र गरमीच्या दिवसात, खूप चालणं किंवा व्यायाम झाल्यावर हे प्रमाण 4 ते 5 लिटरपर्यंत वाढवावं. काहींना सुरुवातीला इतकं पाणी पिणं कठीण वाटेल, पण हळूहळू सवय लागते. आणि ही सवय तुम्हाला केवळ किडनीचेच नव्हे तर अनेक फायदे देते.

पुरेसं पाणी घेतल्याने तुमचं पोट सुद्धा साफ राहतं, बद्धकोष्ठतेची तक्रार दूर होते आणि चेहराही उजळतो. त्वचा मऊ, स्वच्छ आणि तजेलदार दिसू लागते. थोडक्यात, शरीरातले बरेचसे आजार जिथे सुरू होतात, ती घाणच जर बाहेर गेली, तर त्रासाचं मूळच उरत नाही.

तेव्हा, बाजारात महागड्या औषधांमागे धावण्याऐवजी, साधं पाणी पिण्याची शिस्त लावून घ्या. रोजच्या जीवनात या एकाच सवयीमुळे तुमच्या आरोग्यात मोठा बदल होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!