कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज लावायला आपल्याला खूप उशीर लागतो. पण जर तुम्हाला फक्त त्यांच्या जन्मतारखेवरूनच त्यांचं व्यक्तिमत्त्व, वागणं, आणि वृत्ती समजून घेता आलं, तर? अंकशास्त्र ही अशीच एक प्राचीन विद्या आहे, जी आपल्याला फक्त संख्यांवरून माणसाचे गुणदोष, स्वभाव आणि त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे संकेत समजून देऊ शकते.

अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचा मूलांक म्हणजेच त्यांच्या जन्मतारखेतील आकड्यांचे बेरीज करून आलेली एक अंकी संख्या असते, ही संख्या त्यांच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकते. या संख्यांशी संबंधित ग्रह त्यांच्या स्वभावाची दिशा ठरवतात. आणि काही मूलांक असेही असतात, ज्यांचे स्वभाव इतके तीव्र किंवा गुंतागुंतीचे असतात की त्यांच्याशी मैत्री करण्यापूर्वी सावध राहणं शहाणपणाचं ठरतं.
मूलांक 3
उदाहरणार्थ, अंक 3 असलेले लोक अत्यंत जबाबदार आणि कुटुंबाशी समर्पित असतात. गुरू या ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांच्यात नेतृत्वगुण, ध्येयपूर्तीची जिद्द आणि शिक्षणाकडे आकर्षण असतं. पण त्यांच्यात एक गोष्ट खूप ठळक असते, अहंकार. हे लोक आपल्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा इतका गर्व बाळगतात की बऱ्याच वेळा इतरांवर कुरघोडी करतात. आपल्या मताला सर्वात योग्य मानणं आणि दुसऱ्याचं ऐकून न घेणं, या स्वभावामुळे नातेसंबंधांमध्ये अंतर निर्माण होऊ शकतं.
मूलांक 4
तसेच, मूलांक 4 असलेले लोक म्हणजे राहूच्या प्रभावाखाली असणारे. हे लोक वेगळ्या विचारांचे, थोडे हट्टी आणि तापट असतात. लवकर रागावतात आणि रागाच्या भरात नको ते बोलून टाकतात. त्यांच्या मनात काय चाललं आहे हे सहज समजत नाही, आणि त्यामुळे अनेक वेळा त्यांच्या बोलण्यावर किंवा वागणुकीवर विश्वास ठेवणं अवघड जातं. त्यांच्या जीवनात अस्थिरता जास्त असते आणि त्यांचा स्वभाव चटकन बदलतो.
मूलांक 8
मूलांक 8 असलेले लोक म्हणजे शनी ग्रहाचे प्रभावीत. शनी हा कर्माचा, संयमाचा आणि थोडासा कठोर परिणामांचा ग्रह मानला जातो. त्यामुळे या मूलांकाचे लोक गंभीर, अंतर्मुख आणि अनेकदा रहस्यमय असतात. त्यांना आपल्या भावनांना सहज व्यक्त करता येत नाही आणि त्यांचा दृष्टिकोनही इतरांपेक्षा वेगळा असतो. या लोकांचा सर्वात मोठा दोष म्हणजे, ते अनेक वेळा कोणत्याही ठोस कारणाशिवाय एखाद्याविरुद्ध शत्रुत्वाची भावना बाळगतात. त्यांच्या मनात एकदा राग किंवा संकोच निर्माण झाला, की ते सहजपणे संपवणं कठीण जातं.
या तिन्ही मूलांकांमध्ये एक गोष्ट समान आहे, भावनांवर नियंत्रण नसणं. कधी अहंकार, कधी तापटपणा, तर कधी उगाच निर्माण झालेला द्वेषभाव. त्यामुळे अशा व्यक्तींशी संबंध ठेवताना थोडं अधिक समजूतदारपणे, संयमाने आणि जागरूकतेने वागणं गरजेचं असतं.