Job Resignation:भारतात पुढील काही महिन्यांत मोठ्या संख्येने कर्मचारी त्यांच्या नोकरीचा राजीनामा (Job resignation) देण्याची तयारी करत आहेत.
कोरोना महामारी (Corona epidemic) नंतर राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. आता रिक्रूटमेंट एजन्सी मायकल पेजच्या अहवालात असे समोर आले आहे की 86 टक्के कर्मचारी पुढील 6 महिन्यांत नोकरीचा राजीनामा देऊ इच्छित आहेत. कर्मचारी चांगल्या पगारासाठी तसेच वर्क लाईफ बॅलन्स (Work life balance) साठी नोकरी सोडण्यास तयार असतात.

येत्या काही दिवसांत वाढ होईल –
अहवालानुसार, 61 टक्के कर्मचारी असे आहेत ज्यांना त्यांच्या कामाच्या आयुष्यात संतुलन राखण्यासाठी नोकरीचा राजीनामा द्यायचा आहे. अहवालानुसार कोरोना महामारीनंतर नोकरीचा राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. येत्या काही दिवसांत त्याला आणखी वेग येईल.
कोविड नियमांचे पालन करण्यावर चर्चा –
मोठ्या संख्येने कर्मचार्यांनी नोकरी सोडल्याचा परिणाम सर्व प्रकारच्या बाजारपेठा आणि उद्योगांमध्ये दिसून येईल. पुढील काही महिन्यांत सर्वोत्कृष्ट टॅलेंटचे स्थलांतर होत आहे, जे पुढेही वाढत जाईल, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.
याशिवाय अनेक कार्यालयांमध्ये कोविडचे नियम (Covid’s rules) पाळण्याबाबत वाद सुरू आहे. काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम कल्चर आवडले नाही, अशा 11 टक्के कर्मचारी आता नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत.
नोकरी सोडण्यात भारतीय कर्मचारी आघाडीवर –
करिअरची वाढ, कमी पगार (Low pay), करिअरच्या भूमिकेत किंवा उद्योगातील बदल आणि कंपनीच्या दिशानिर्देशावर नाखूष असल्यामुळे बहुतेक कर्मचारी राजीनामा देत आहेत. 12 देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतीय कर्मचारी नोकरी सोडण्यात आघाडीवर आहेत. भारतातील बहुतेक कर्मचारी येत्या काही दिवसांत नोकरी सोडण्याचा विचार करत आहेत.
त्यानंतर इंडोनेशिया (Indonesia), फिलीपिन्स, मलेशिया, थायलंड आणि आग्नेय आशियाचा क्रमांक लागतो. अहवालानुसार, खाजगी क्षेत्रापेक्षा सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी नोकरी सोडण्यास अधिक इच्छुक आहेत.