आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाने भरलेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह ही एक सामान्य पण गंभीर समस्या बनली आहे. शरीरात रक्तातील साखरेची पातळी 300 पेक्षा जास्त झाली की ती केवळ आकड्यांची समस्या राहत नाही, तर ती इतर आजारांची दारं उघडते. अशा वेळी औषधांबरोबरच घरगुती आणि नैसर्गिक उपायांनीही काहीतरी फरक पडतो हे लक्षात घ्यायला हवं.

स्वयंपाकघरातील दोन साधे मसाले दालचिनी आणि मेथी हे केवळ चव वाढवण्यासाठीच नाही, तर तुमच्या आरोग्यासाठीही अमूल्य ठरू शकतात. विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही एक सोपी, नैसर्गिक आणि स्वस्त कृती आहे, जी दररोज केली तर साखरेच्या पातळीवर स्पष्ट परिणाम दिसून येतो.
दालचिनीचे पाणी
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी जर तुम्ही एक ग्लास कोमट दालचिनीचं पाणी प्यायलं, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या रक्तातील ग्लुकोज पातळीवर होतो. दालचिनीमध्ये किंजारिन नावाचे घटक असतात जे शरीराच्या इन्सुलिन संवेदनशीलतेत वाढ करतात. यामुळे पेशींना साखर शोषून घेण्यासाठी अधिक मदत मिळते आणि रक्तातली साखर कमी होते. आयुर्वेदातही दालचिनीच्या पाण्याचे विशेष महत्त्व आहे, विशेषतः मधुमेह नियंत्रणासाठी.
मेथीचे पाणी
दुसरीकडे, मेथी हा देखील एक महत्वाचा घटक आहे. रात्री झोपण्याआधी एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ठेवावेत आणि सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यावं. यामध्ये असलेले सॉल्युबल फायबर्स शरीरातील ग्लुकोज शोषणाची गती कमी करतात. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेत होणारी झपाट्याने वाढ टळते. शिवाय, यामुळे पचनक्रिया सुधारते आणि हाडांनाही पोषण मिळतं.
त्यातच जर दालचिनी आणि मेथी हे दोन्ही घटक एकत्र करून पाणी तयार केलं, तर त्याचा परिणाम डबल होतो. हे मिश्रण केवळ रक्तातील साखर कमी करत नाही, तर शरीरातील चयापचय क्रिया सुधारते, सूज कमी होते आणि हळूहळू शरीराची इन्सुलिन प्रक्रिया अधिक सक्षम बनते.
मधुमेहाचं नियंत्रण फक्त गोळ्यांवर सोडून चालत नाही. यासाठी आपल्या दैनंदिन सवयी, आहार आणि जीवनशैलीमध्येही बदल आवश्यक आहे. रोज 20 ते 30 मिनिटं चालणं, पुरेशी झोप, योग्य आहार आणि असे काही नैसर्गिक उपाय यांचा योग्य मिलाफ केल्यास साखरेची पातळी 300 च्या वरून लक्षणीयरीत्या खाली आणणं अवघड नाही.