महाराष्ट्रात आहे असं ठिकाण, जिथे शंभरातले 90 लोक विसरतात श्वास! बघा रहस्य

Updated on -

कधी कधी एखादं ठिकाण पाहिल्यावर श्वास जणू काही थांबून जातो. शब्द सुचेनात, डोळे थक्क होतात, आणि मन भूतकाळात हरवून जातं. असंच एक ठिकाण आहे महाराष्ट्रात वेरूळ लेणी, ज्याला पाहिलं की प्रत्येकजण काही क्षणांसाठी तरी विसरतो की तो २१व्या शतकात आहे. हे केवळ पुरातत्वाचे ठसे नाहीत, हे आहेत भारतीय बुद्धीची, श्रद्धेची आणि सर्जनशीलतेची शाश्वत खूण.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून अवघ्या तीस किलोमीटरवर असलेली ही जागा म्हणजे इतिहासाच्या दगडी पायऱ्यांतून जात असलेली एक अद्भुत सफर आहे. एकाच प्रचंड डोंगरात कोरलेल्या ३४ लेण्या ज्यामध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन संस्कृतीचं निस्सीम सौंदर्य एकत्र नांदतं. इथे आल्यावर जाणवतं की भारताचं सांस्कृतिक वैविध्य केवळ पुस्तकांत नाही, तर इथल्या प्रत्येक शिलाखंडात श्वास घेतंय.

या सर्व लेण्यांमध्ये विशेष लक्ष वेधून घेते ती गुहा क्रमांक १६ कैलास मंदिर. आजही संशोधकांना आणि अभ्यासकांना याची रचना समजून घेताना नवा नवा अचंबा वाटतो. हे मंदिर वरून खाली एकाच खडकात कोरलं गेलं आहे यंत्रांच्या आधीच्या काळात, फक्त हातोडा आणि छिन्नीच्या मदतीने. अशा कामाला दोन शतके लागली तरी ते कमीच वाटतं, कारण आजसुद्धा आपण या वास्तूकडे बघताना थक्क होतो. मंदिराच्या भिंतींवरची रामायण-महाभारताच्या दृश्यांची कोरीव सजावट इतकी सूक्ष्म आणि जिवंत वाटते की आपण त्या गोष्टींचा भाग झाल्यासारखं वाटतं.

वेरूळ लेण्यांची रचना पाहताना एक गोष्ट ठळकपणे जाणवते या गुहांमध्ये केवळ स्थापत्यशास्त्र नव्हे, तर आंतरिक शांतीचा सुद्धा खोल अनुभव आहे. काही गुहांमध्ये प्रवेश करताच नैसर्गिक प्रकाशाची अशी सोय दिसते की, जणू शिल्पकारांनी काळाच्या पुढचं तंत्रज्ञान आधीच जाणलं होतं. तर काही ठिकाणी प्रतिध्वनीचा अनुभव मनाला अलगद भिडतो. ही केवळ गुहा नाही, हे ध्यानस्थ जागा आहेत मन स्थिर करण्यासाठी, अंतर्मुख होण्यासाठी.

सहाव्या ते दहाव्या शतकादरम्यान या लेण्यांची निर्मिती झाली आणि यात राष्ट्रकूट राजवंशाचं मोलाचं योगदान मानलं जातं. तत्कालीन कारागीर आणि शिल्पकारांनी केवळ आदेश पाळला नाही, तर आपलं मन, श्रद्धा आणि सर्जनशीलता प्रत्येक शिलाखंडात ओतली आहे. म्हणूनच ही लेणी पाहताना प्रत्येक कोपऱ्यात एक नवा अनुभव मिळतो, एक नवा गूढ संवाद आपल्याला ऐकू येतो.

आज वेरूळ लेणी ही युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये गणली जातात. दरवर्षी हजारो देशी आणि विदेशी पर्यटक इथे येतात काही इतिहास शिकण्यासाठी, काही सौंदर्य पाहण्यासाठी, तर काही फक्त शांत बसून या जागेचं अस्तित्व मनात साठवण्यासाठी. आणि खरंच, एकदा वेरूळच्या लेण्यांतून बाहेर आल्यावर तुमचं मन मागेच कुठेतरी अडकून राहतं त्या शिल्पांत, त्या पौराणिक कहाण्यांत आणि त्या थरारक शांततेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe