नवविवाहितेला निरोप देताना शुभ मुहूर्त का पाळावा?, सुखी वैवाहिक आयुष्याशी जुडलंय याचं कारण, वाचा शास्त्र काय सांगते!

Published on -

लग्न लागल्यानंतर आपल्या लाडक्या लेकीला वाटी लावणे, ही प्रत्येक आई-वडिलांसाठी अत्यंत कठीण गोष्ट असते. हा एक आनंदाचा क्षणही असतो मात्र तितकाच तो भावनिक देखील असतो. कारण मुलगी किंवा सून ही जेव्हा लग्नाच्या मांडवातून निरोप घेते, तेव्हा एक नवा अध्याय सुरू होतो आणि मागे राहते ती फक्त आठवणींची शिदोरी. हिंदू धर्मात निरोप हा केवळ एक प्रथा नाही, तर नव्या आयुष्याच्या दारावर उभ्या असलेल्या वधूसाठी शुभ आणि सौख्यदायी प्रारंभ ठरण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.

जेव्हा लग्नाचा कार्यक्रम जवळ येतो, तेव्हा घरात फक्त सजावट आणि गोंगाट नसतो, तर मनामध्ये भावनांचं एक वादळही असतं. या काळात प्रत्येक आईच्या डोळ्यांतून तिच्या लेकराच्या लहानपणीच्या आठवणी ओघळतात, आणि वडिलांच्या मनात एक अनाम भीती असते – तिचं पुढचं आयुष्य कसं असेल, तिला सासरचे कसे सांभाळतील? म्हणूनच या सगळ्या भावना जपत आणि भविष्याची सकारात्मक नांदी करत वधूचा निरोप योग्य वेळेवर घेणं हे केवळ परंपरेचं पालन नाही, तर तिच्या सुखी संसाराचं शास्त्रीय आणि आध्यात्मिक बळही ठरतं.

निरोप देण्याची वेळ-

हिंदू धर्मग्रंथांनुसार संध्याकाळची वेळ ही विदाईसाठी सर्वात शुभ मानली जाते. जेव्हा सूर्य मावळतीकडे झुकतो आणि संपूर्ण आसमंत अत्यंत सुंदर रंगात सजलेला असतो तेव्हा गायी आपल्या गोठ्याकडे परतू लागतात. ही वेळ पृथ्वीच्या शांततेची आणि सौंदर्याची असते. असा विश्वास आहे की, या वेळी दिलेला निरोप वधूच्या पुढील वाटचालीत प्रेम, स्थैर्य आणि समृद्धी घेऊन येतो. या वेळेचं वैशिष्ट्य म्हणजे ती दिवसभराच्या धावपळीपासून थोडा विराम असतो – मन शांत असतं, वातावरणही हलकं आणि भावनात्मक असतं.

‘या’ वेळा शकतो टाळाच

हा वेळ निरोपासाठी मानला जातो. मात्र, काही वेळा या निरोप देण्यासाठी टाळायला हव्यात. रात्रीचा काळ, विशेषतः मध्यरात्र किंवा अगदी उशिरा रात्रीची वेळ ही धार्मिक दृष्टिकोनातून नकारात्मक ऊर्जेने भरलेली असते असं मानलं जातं. यामध्ये राहुकाळ, यमगंड काळ किंवा भद्र काळ यांचा समावेश होतो. या काळात केलेली विदाई वधूच्या जीवनात अनावश्यक संकटं आणू शकते, अशी श्रद्धा आहे.

एकंदरीत मुलगी किंवा सुनेचा निरोप म्हणजे केवळ एक सोहळा नाही, तर भावनांची आणि श्रद्धेची गाठ असते. योग्य वेळ, शांत वातावरण आणि कुटुंबाच्या आशीर्वादाने सजलेला हा क्षण वधूच्या आयुष्यात केवळ आठवणीत राहणारा नसतो, तर ती तिच्या सुखी संसाराची मजबूत पायाभरणी देखील ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News