भारताच्या आधुनिक शस्त्रास्त्रांची ‘ही’ यादी वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल! ब्रह्मोस ते तेजस, सगळं येथे जाणून घ्या!

Published on -

भारताची लष्करी ताकद आता तंत्रज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचली आहे. गेल्या काही वर्षांत भारताने आपल्या संरक्षण क्षेत्रात जे प्रगतीचे पाऊल टाकले आहे, ते पाहता देश आता केवळ संरक्षणासाठी सज्ज नाही, तर कुठल्याही शत्रूला धडकी भरवण्याच्या स्थितीत आहे. क्षेपणास्त्रं, लढाऊ विमानं, युद्धनौका, पाणबुडी आणि रणगाड्यांसह भारताची सैन्यशक्ती एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली आहे. ही अशी काही शस्त्रं आहेत, जी फक्त कागदावर प्रभावी वाटत नाहीत, तर त्यांच्या अस्तित्वामुळेच चीन, पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांना देखील घाम फुटतो.

‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र

या संरक्षण यंत्रणेत ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. भारत-रशिया संयुक्त सहयोगातून बनलेलं हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र जमिनीवरून, समुद्रातून आणि हवेतूनही डागता येतं. त्याचा वेग आणि अचूकता एवढी जबरदस्त आहे, की काही सेकंदांत शत्रूचा बालेकिल्ला उध्वस्त होऊ शकतो. याच शृंखलेत ‘अग्नि-5’ क्षेपणास्त्र हे भारतीय सामरिक क्षमतेचं प्रतीक आहे. तब्बल 7,000 ते 8,000 किमी अंतर पार करून ते शत्रूच्या अंतःकरणात मारा करू शकतं आणि यामध्ये अनेक वॉरहेड्स एकाचवेळी टाकण्याची क्षमता आहे.

‘आकाश’ क्षेपणास्त्र

युद्धाच्या मैदानात ‘आकाश’ क्षेपणास्त्रसंस्थेचीही भूमिका महत्त्वाची आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारी ही यंत्रणा हवेतून येणाऱ्या कोणत्याही आक्रमणाला रोखू शकते. तर ‘पृथ्वी’ मालिका ही शत्रूच्या जवळपासच्या भागांवर अचूक मारा करणारी शस्त्रसज्जता आहे, ज्यात पारंपरिक आणि अण्वस्त्र दोन्ही प्रकारे धक्का देता येतो.

‘तेजस’ आणि’राफेल’

हवेतून होणाऱ्या युद्धात भारताची ‘तेजस’ ही स्वदेशी बनावटीची लढाऊ विमानं आता सक्षमपणे झेपावत आहेत. हलकं, चपळ आणि आधुनिक टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेलं हे विमान केवळ शौर्याचं नाही तर भारताच्या स्वयंपूर्णतेचंही प्रतीक आहे. आणि या क्षमतेला अधिक बल मिळतं फ्रान्समधून आलेल्या ‘राफेल’ विमानांमुळे. विविध प्रकारची क्षेपणास्त्रं घेऊन उडू शकणारं हे विमान भारतीय हवाई दलाला एक नवे सामर्थ्य देतं.

टी-90 भीष्म टँक

जमिनीवर रणभूमीत टी-90 भीष्म टँक म्हणजे भारताची रणशक्तीचा कणा आहे. हलकं असूनही मजबूत आणि अत्याधुनिक तोफ प्रणालीमुळे हे टँक शत्रूच्या संरक्षण रेषा भेदण्यात माहिर आहे. याच लढाईतील आणखी एक मोठं अस्त्र म्हणजे ‘आईएनएस विक्रमादित्य’ भारतीय नौदलाची गर्जना करणारी विमानवाहू नौका. 283 मीटर लांबीची ही युद्धनौका 36 लढाऊ विमानं घेऊन समुद्रात धाडसी मुसंडी मारू शकते.

‘अरिहंत’ अण्वस्त्रवाहक पाणबुडी

त्याचबरोबर समुद्राखाली शांतपणे वाट पाहणारी ‘अरिहंत’ ही अण्वस्त्रवाहक पाणबुडी म्हणजे भारताच्या सागरी ताकदीचं गुप्त पण प्रभावी शस्त्र आहे. ती समुद्राच्या खोल पाण्यात राहून शत्रूवर जबरदस्त अण्वस्त्र हल्ला करू शकते.

अलीकडे विकसित झालेली 25 टन वजनाची हलकी रणगाडी लडाखसारख्या उंच भागात सहजपणे तैनात केली जाऊ शकते. तिच्या तोफ, मशीनगन आणि अँटी-टँक प्रणालीमुळे ती कोणत्याही आव्हानास सामोरे जाऊ शकते.

या सर्व शस्त्रसज्जतेमुळे भारत केवळ संरक्षणात्मक नाही तर सामरिकदृष्ट्या अग्रगण्य राष्ट्र बनलं आहे. आता कुणीही भारताच्या सीमेकडे वाकड्या नजरेने पाहिलं, तर त्यांना हे ‘धोकादायक दहा’ सामर्थ्य दाखवायला भारत नेहमी तयार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!