बँक बुडाली तर, ठेवीदारांना किती रक्कम परत मिळते ? जाणून घ्या RBI चे नियम आणि पैशांचे संरक्षण करण्याच्या टिप्स

रिझर्व्ह बँकेच्या या आदेशानंतर बँकेच्या ग्राहकांमध्ये आणि ठेवीदारांमध्ये मोठे संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आरबीआयच्या या कठोर कारवाईनंतर बँक ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआयने अनेक बँकांवर अशी कारवाई केली आहे. आरबीआय ने काही बँकांचे चक्क लायसन्स रद्द केले आहे तर काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Published on -

RBI Banking Rule 2025 : आरबीआय अर्थातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक मुंबईवर बंदी घातली आहे. बँकेतील गडबड उघडकीस आल्यानंतर ही बंदी घालण्यात आली आहे. या निर्बंधानंतर मुंबई येथील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला काल, 13 फेब्रुवारी 2025 पासून कोणतेही नवीन कर्ज वाटप करता येणार नाही. जुन्या कर्जाचं नूतनीकरणही करता येणार नाही.

या बंदीनंतर बँकेचे ग्राहक आपले पैसेही काढू शकत नाहीत. दरम्यान बँकेची स्थिती सुधारेपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत. दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या या आदेशानंतर बँकेच्या ग्राहकांमध्ये आणि ठेवीदारांमध्ये मोठे संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आरबीआयच्या या कठोर कारवाईनंतर बँक ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

खरे तर गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआयने अनेक बँकांवर अशी कारवाई केली आहे. आरबीआय ने काही बँकांचे चक्क लायसन्स रद्द केले आहे तर काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान आरबीआयच्या या कारवाईनंतर अनेकांच्या माध्यमातून जर बँक दिवाळखोरीत गेली म्हणजेच बँक बुडाली तर ग्राहकांच्या पैशांचे काय होते असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

दरम्यान आज आपण याच बाबत आरबीआयचे नियम काय सांगतात याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारतामध्ये बँक दिवाळखोर झाली तर ठेवीदारांना ठेवींच्या सुरक्षिततेसाठी ठराविक मर्यादेपर्यंत विमा संरक्षण मिळते.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या नियमानुसार, डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) ही संस्था ठेवीदारांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी विमा कवच प्रदान करते. चला जाणून घेऊया या नियमांबद्दल आणि आपले पैसे सुरक्षित ठेवण्याचे मार्ग.

बँक बुडाली तर किती पैसे परत मिळतात ?

जर कोणतीही बँक दिवाळखोर झाली किंवा तिच्यावर निर्बंध लागू झाले, तर DICGC ठेवीदारांना त्यांच्या ठेवीसाठी 5 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण देते. या मर्यादेत बचत खाते, स्थिर ठेवी (FD), चालू खाते, आवर्ती ठेव (RD) यांचा समावेश होतो. याचा अर्थ असा की, जरी तुमच्या खात्यात 10 लाख रुपये असले, तरीही बँक दिवाळखोरीत गेल्यानंतर तुम्हाला फक्त 5 लाख रुपयेच परत मिळतील.

हे संरक्षण कोणत्या बँकांसाठी लागू आहे ?

DICGC विमा संरक्षण सर्व अनुसूचित बँकांवर लागू असते, जसे की, सार्वजनिक क्षेत्रातील SBI, PNB, BoB इ. बँका, HDFC, ICICI, Axis इ. खासगी बँका तसेच सहकारी बँका आणि लहान वित्तीय बँका.

पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे ?

वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे ठेवा – जर तुमच्याकडे मोठी रक्कम असेल, तर ती वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवा, त्यामुळे जास्तीत जास्त रक्कम विमा संरक्षणाखाली राहील.
वेगवेगळ्या प्रकारच्या खात्यांचा वापर करा – संयुक्त खाती, वेगवेगळ्या शाखांमधील खाती यामुळे जोखीम कमी होते.
सरकारी बँकांवर अधिक विश्वास ठेवा – सार्वजनिक क्षेत्रातील बँका तुलनेने अधिक सुरक्षित मानल्या जातात. यामुळे तुम्ही तुमचे पैसे सरकारी बँकांमध्ये ठेवले पाहिजेत. स्टेट बँक ऑफ इंडिया एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका म्हणून ओळखल्या जातात. यामध्ये गुंतवलेले पैसे सहसा बुडत नाहीत त्यामुळे तुम्ही अशाच विश्वासू बँकांमध्ये तुमचे पैसे ठेवायला हवेत.
बँकेची आर्थिक स्थिती तपासा – बँकेच्या आर्थिक तंदुरुस्तीविषयी माहिती मिळवण्यासाठी वार्षिक अहवाल, रेटिंग्स पाहावेत.
पोस्ट ऑफिस आणि सरकारी बाँड्समध्ये गुंतवणूक करा – बँक ठेवींव्यतिरिक्त इतर सुरक्षित पर्याय निवडून जोखीम कमी करता येते.
एकंदरीत, बँक दिवाळखोर गेली तर ठेवीदारांना 5 लाख रुपये पर्यंत संरक्षण असते, मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी ठेवींचे विविध पर्याय वापरणे हितकारक ठरते. आर्थिक नियोजन आणि योग्य गुंतवणूक धोरण यामुळे तुमच्या पैशांचे संरक्षण शक्य होते. त्यामुळे आपल्या ठेवींचे योग्य नियोजन करा आणि संभाव्य जोखमींपासून स्वतःला सुरक्षित ठेवा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!