Astrology Upay : गुरू आणि राहूच्या संयोगामुळे ‘या’ राशींच्या लोकांनी काळजी घ्या ! नाहीतर रातोरात व्हाल गरीब

Ahilyanagarlive24 office
Published:

Astrology Upay :  एका ठराविक वेळेनंतर प्रत्येक ग्रह आपली स्थिती बदलतो यामुळे सर्व राशींच्या लोकांवर त्याचा प्रभाव काही काळासाठी पडतो अशी माहिती ज्योतिषशास्त्रात देण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो ग्रह आपली स्थिती बदल्याने सर्व राशीच्या लोकांवर शुभ आणि अशुभ प्रभाव दिसून येते.

तुमच्या माहितीसाठी हे जाणून घ्या 2023 मध्ये देखील अनेक ग्रहांचे संक्रमण होणार आहे. यामध्ये गुरूचाही समावेश आहे.  आम्ही तुम्हाला सांगतो यावेळी गुरु मीन राशी सोडून मेष राशीत  22 एप्रिल रोजी प्रवेश करणार आहे. दरम्यान राहू आधीच मेष राशीमध्ये स्थित आहे. गुरू आणि राहूच्या या संयोगामुळे गुरु चांडाळ योग तयार होईल. यामुळे जाणून घेऊया कोणत्या राशींच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे.

या राशीच्या लोकांना गुरू आणि राहूच्या युतीमुळे सावध राहावे लागेल

मेष

मेष राशीत गुरूचे संक्रमण आणि मेष राशीत राहुची उपस्थिती या राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करेल. या काळात या राशीच्या लोकांना धनहानी होऊ शकते. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आरोग्याशी संबंधित समस्या मेष राशीच्या लोकांना त्रास देऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सतर्क राहण्याची गरज आहे. कारण गुरु चांडाळ योगामुळे अधिकाऱ्याशी वाद होऊ शकतो. कोठेही नवीन गुंतवणूक करणे टाळा.

कर्क

ज्योतिष शास्त्रानुसार, गुरूचा मेष राशीत प्रवेश आणि राहूशी संयोग कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करेल. या राशीच्या लोकांनी या काळात शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. या दरम्यान कामाच्या ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. गुरु चांडाळ योग तुमच्यासाठी अडचणी निर्माण करेल. अशा स्थितीत वाणीवर नियंत्रण ठेवणे चांगले राहील.

मिथुन

गुरू आणि राहूच्या संयोगाने गुरु चांडाळ योग तयार होईल. या काळात मिथुन राशीच्या लोकांना काही समस्यांना सामोरे जावे लागेल. मिथुन राशीच्या लोकांनी या काळात गुंतवणूक करणे टाळावे. शेअर मार्केट आणि लॉटरीत पैसे गुंतवण्यापूर्वी अनेक वेळा विचार करा. धनहानी होण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत या लोकांच्या उत्पन्नात घट होऊ शकते. यासोबतच व्यक्तीला तणावाचाही सामना करावा लागू शकतो.

केतूचा अशुभ प्रभाव कमी करण्याचे उपाय

केतू ग्रहाच्या शांतीसाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. त्यात काही दूर्वा पण टाका. यासोबतच संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा. केतूचा प्रकोप टाळण्यासाठी रविवारी मुलींना खीर आणि गोड दही खाऊ घाला.

हे पण वाचा :- Cheapest 5G Phone : महागाईत दिलासा ! ‘या’ 5G फोनवर मिळत आहे भन्नाट ऑफर ; होणार 17600 रुपयांची बचत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe