Healthy Eating Tips : मिठाई खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची चूक करताय?; थांबा वाचा त्याचे परिणाम !

Published on -

Drinking water After Eating Sweets : आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:ला निरोगी ठेवणे फार महत्वाचे आहे. कळत-नकळत आपल्याकडून अशा अनेक छोट्या-छोट्या चुका होत असतात, ज्यामुळे आपले आरोग्य बिघडू शकते. अशाच एका आजाराचे नाव आहे मधुमेह.

अर्थात हा आजीवन आजार आहे, पण त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण रक्तातील साखरेची पातळी ओव्हरफ्लो झाल्याने अनेक जीवघेणे आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत, निरोगी जीवनशैली आणि चांगले खाणे सर्वात महत्वाचे आहे. तसेच मिठाई खाणे देखील टाळले पाहिजे.

डायबिटीजमध्ये गोड खाणे हानिकारक ठरू शकते. अशातच जर तुम्ही गोड खाल्ले आणि लगेच पाणी प्यायले तर ते देखील तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. मिठाई खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यास भाग पाडत आहात.

आता प्रश्न असा आहे की मिठाई खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे? मधुमेह घातक कसा होऊ शकतो? पाणी पिण्याची इच्छा कमी कशी करावी? या प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे…

जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर सर्वप्रथम त्याने मिठाई खाणे टाळावे. यानंतरही कोणी मिठाई खात असेल तर लगेच पाणी पिणे टाळावे. कारण ज्या लोकांना मिठाईसोबत पाणी पिण्याची सवय असते त्यांना टाइप-2 मधुमेहाचा धोका झपाट्याने वाढतो. वास्तविक, पाण्यासोबत ग्लुकोज शरीरात झपाट्याने शोषले जाते.

मिठाई खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी कधीही चांगले नाही. असे केल्यास शरीरात ग्लुकोज झपाट्याने शोषून घेणे सुरू होईल. त्यामुळे साखरेची पातळीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. अशा स्थितीत मिठाई खाल्ल्यानंतर साधारण ३० मिनिटांनी पाणी प्यायले तर बरे होईल. शक्य असल्यास, आपण ही वेळ वाढवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe