जायकवाडी वरून रणक्रंदन ! नाशिकमध्येही जलसंकट, मराठवाड्याने मृतसाठा वापरावा..यासह अनेक मुद्द्यांचा उहापोह, पहा स्पेशल रिपोर्ट

Updated on -

सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच दुष्काळी स्थिती आहे. त्यातच जायकवाडीला नगर नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडावे अशी मागणी होत आहे. याला मात्र विरोध सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यातून पाणी सोडण्यास विरोध होत असताना आता नाशिक मधूनही पाणी सोडण्यास विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे जायकवाडी वरून रणक्रंदन निर्माण झाला असल्याचे चित्र आहे.

नाशिकमध्येही दुष्काळी स्थिती गंभीर असल्याने नाशिकमधून जायकवाडीला पाणी सोडण्याऐवजी जयकवाडीमधील मृत साठ्यातून पाणी वापर करावा, सन २०१२ आणि २०१५ ला असेच केले होते असे मत नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी मांडले आहे.

दुष्काळी स्थितीमुळे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांतून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश कार्यकारी संचालकांनी दिले आहेत.परंतु यावरून चांगलाच वाद सुरु झाला आहे. नगरणशीक मधून याला विरोधहोत आहे. दरम्यान आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधान सचिवांना गंगापूरमधून ५०० दलघफू पाणी सोडू नये, दोन्ही भागांसाठी सोयीचे म्हणून जायकावडीतील मृत साठा वापरावा अशी विनंती केली आहे.

नाशिककर नेमके काय म्हणतायेत ?

पाणी सोडल्यास नाशिककरांवरही दुष्काळाचे सावट येईल.
नाशिक मध्ये अनेक प्रकारच्या फळबागा आहेत त्यान्चिस्थिती वाईट होईल
गंगापूर धरणात ६०० दलघफू गाळ साठला असून मृत साठाही नाही हे देखील लक्षात घेतले पाहिजे
दरम्यान आज मितीला जायकवाडीत २५ टीएमसी मृत साठा असल्याने तोच त्याठिकाणी वापरावा जेणेक रन सगळीकडची समस्या मिटून जाईल

नाशिक मधील विविध अधिकाऱ्यांचे काय आहे मत ?

जनतेचे काय म्हणणे आहे हे आपनवर पाहले. आता नाशिक मधील अधिकारी काय म्हणत आहेत ते देखील पाहुयात

१ ) नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक जिल्ह्यातही टंचाईची स्थिती आहे. मी टंचाई शाखेचा प्रमुख या नात्याने मला त्याही बाबींचा विचार करायचा आहे. नाशिकमध्येही पाणीटंचाईची समस्या येऊ नये, यासाठी नियोजन केले जात आहे असे शर्मा म्हणाले आहेत.

२ ) नाशिकचे कार्यकारी अभियंता, सोनल शहाणे

आकस्मिक पाणी आरक्षण बैठकीवेळी नाशिकमधील सर्व लोकप्रतिनिधींचे नाशिकमधून पाणी सोडण्याबाबतचे मत जिल्हधिकाऱ्यांनी कार्यकारी संचालकांना कळविले असल्याचे शहाणे या म्हणाल्या आहेत.

जुना धक्कादायक अहवाल – जायकवाडीसाठी १९३ नव्हे, तर १५७ टीएमसी नुसार समन्यायी वाटप होणे गरजेचे

२००४ मध्ये शासनाने ३ मुख्य अभियंत्यांची एक समिती नेमली होती. त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होत की, जायकवाडी धरण बांधकामासाठी वापरण्यात आलेली ब्रिटिशकालीन पद्धत कालबाह्य असल्याने यातील पाणीसाठा १९६.३ नव्हे, तर १५७.०२ टीएमसी आहे. त्यामुळे जायकवाडीला १५७ टीएमसी समन्यायी पाणीवाटप हाच पर्याय उरतो असं सांगितलं होतं. परंतु अद्यापही त्याकडेही दुर्लक्षच झाले आहे.

मराठवाडाकर म्हणतायेत ही तर ‘निजामशाही’

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळचे निवृत्त कार्यकारी संचालक शंकरराव नागरे यांनी संतप्त भूमिका मांडली आहे. नगर-नाशिकने आधीच जास्त पाणी अडवून मराठवाड्याची फसवणूक केली. आता कोर्टाचे आदेश डावलून समन्यायी पाणीवाटपातही अडवणूक होत असल्याचे ते म्हणालेत. पुढे ते म्हणाले की, यात शासनाची भूमिकाही शंकास्पद वाटत असून हा सारा प्रकार निजामशाहीसारखाच आहे असे ते म्हणालेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!