शेतकऱ्यांनो! वास्तव स्वीकारून सात नंबर अर्ज भरा अन्यथा भविष्यात शेती धोक्यात येऊ शकते

कोपरगाव- शेतीसाठी सिंचनाचे आवर्तन कमी होत चालल्याने आणि पाण्याचा साठा घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आता कल्पनेच्या विलासात न राहता वास्तव स्वीकारून सात नंबर अर्ज भरण्याची आवश्यकता आहे, असे मत माजी नगराध्यक्ष व शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी शुक्रवारी, दि. १ ऑगस्ट रोजी कोपरगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी बोलताना पद्माकांत कुदळे … Read more

निष्क्रीय आणि कर्तव्यशून्य अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, छावा ब्रिगेडची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे मागणी

श्रीरामपूर- राजूर येथील आदिवासी प्रकल्पामधील निष्क्रीय आणि कर्तव्यशून्य अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी छावा ब्रिगेडच्या वतीने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले, की संबंधित अधिकाऱ्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करत छावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघ यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी संबंधित … Read more

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेसाठी अधिक संवेदनशीलतेने काम करावे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना

राहाता- महसूल विभाग हा थेट सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असल्याने महसुली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलतेने, तसेच सकारात्मक संवादाच्या माध्यमातून काम करावे. यामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण होईल, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राहाता येथे महसूल विभागातर्फे आयोजित ‘महसूल सप्ताह – २०२५’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी माजी … Read more

श्रीरामपूर शहरातील आठवडे बाजार पुन्हा जुन्या जागेवरच भरणार, आमदार हेमंत ओगले यांच्या पुढाकारातून प्रश्न लागला मार्गी

श्रीरामपूर- गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीरामपूरचा बाजार दोन ठिकाणी भरल्याने व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आमदार हेमंत ओगले यांनी काल पुढाकार घेत विक्रेते व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मोरगे वस्ती, अक्षय कॉर्नर परिसरात जागेची आखणी करून रस्त्यावर तसेच शाळा व हॉस्पिटलला अडथळा होणार नाही, अशा स्थितीत विक्रेते व शेतकऱ्यांनी आपली दुकाने लावावी, अशा … Read more

अहिल्यानगर पोलिसांनी बनावट नोंटाचा कारखाना केला उद्धवस्त, २ कोटींचा बनावट नोटांचा कागद हस्तगत, ७ आरोपी अटक

अहिल्यानगर : अहिल्यानगर ते सोलापूर रस्त्यावरील आंबिलवाडी शिवारात पानटपरी चालकाला सिगारेटचे पाकिट घेवून बनावट नोटा देणाऱ्यास नगर तालुका पोलिसांनी अटक केली. पोलिस तपासात तिसगाव, वाळूज, जि. छत्रपती संभाजीनगर येथील भाडेतत्त्वावर घेतलेल्या बंगल्यामध्ये सुरू असलेला बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. तीन ते चार वर्षांपासून हा कारखाना सुरू होता. त्यात सात जणांना अटक करून त्यांच्याकडून ५९ … Read more

पाथर्डी तालुक्यात कोणी गुंडगिरी केली तर त्याला फोडून काढले जाईल, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांचा इशारा

पाथर्डी- हिंदु मुस्लिम असा वाद करु नका. माणुस म्हणुन आपण सर्वजण सारखेच आहोत. चांगेल कर्म करा चांगलेच होईल. तुम्ही एकतेने रहा प्रेमाने वागा. देव सर्वांचाच आहे. भक्ती मार्ग स्वीकारा. येथील देवाच्या दारात भेद भाव नको. तुम्ही चांगले राहीले तर प्रशासन तुम्हाला मदत करील. मात्र कोणी गुंडगिरी केली तर त्याला फोडुन काढले जाईल, असा इशारा पोलिस … Read more

अहिल्यानगरमधील कैकाडी समाज बांधवांनी आमदार सुरेश धस यांची भेट घेत मानले आभार, सभागृहात कैकाडी समाजाविषयी उठवला होता आवाज

मिरजगाव- नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात कैकाडी समाजाच्या न्याय विषयी भूमिका मांडल्याने आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा कैकाडी समाज बांधवांच्यावतीने त्यांच्या या भूमिकेचे स्वागत व समर्थन करून आभार मानण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील कैकाडी समाजाची परिस्थिती अतिशय दयनीय असुन विदर्भात त्यांचा समावेश एस.सी प्रवर्गामध्ये आहे. तर मराठवाड्यात त्यांचा समावेश व्ही.जे.एन.टी प्रवर्गामध्ये आहे. एकच समाज दोन वेगवेगळ्या प्रवर्गात … Read more

तिसगावचा तलाठी सतीश धरम ५० हजारांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडला

करंजी- पाथर्डी तालुक्यातील तिसगाव आणि आडगाव या दोन गावांसाठी असलेले तलाठी सतीश रखमाजी धरम (वय ४० वर्षे) यास गुरुवारी ५० हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. त्याच्या विरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अक्षय सुभाष घोरपडे (वय २७वर्ष धंदा-शेती रा. शिंगवे केशव) यांनी दि.३१ जुलै २०२५ रोजी लेखी तक्रार दिली की, तक्रारदार … Read more

सतत गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवकाची सात दिवसात बदली करा, कोरडगावच्या नागरिकांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

कोरडगाव- पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील ग्रामपंचायत ही परीसरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असुन कोरडगाव येथील लोकसंख्या जवळजवळ सहा हजाराच्या आसपास पोहचलेली असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार मोठा आहे. त्यामध्ये ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे दोन गावचा कार्यभार असल्याने पुर्ण वेळ गावांसाठी देता येत नाही जे दिवस गावांसाठी निवडलेले आहेत. त्या पैकी ग्रामसेवक एकही दिवस हजर राहत नाही असे काम कोरडगाव … Read more

छत्रपती शिवरायांना शाहिरीच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी सातासमुद्रापार नेले- सामाजिक कार्यकर्ते मालोजीराजे भिताडे

राशीन- छत्रपती शिवरायांना शाहिरीच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी सर्वप्रथम सातासमुद्रापार रशियात नेले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची जागृती आणि चळवळ अण्णा भाऊ साठे यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवली म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचे योगदान अतुलनीय आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मालोजीराजे भिताडे यांनी केले. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त मातंग एकता आंदोलन या सामाजिक संघटनेतर्फे साठे चौकात आयोजित … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट नोटांचं रॅकेट उघडकीस करणाऱ्या राहुरी पोलिसांचा करण्यात आला सन्मान

अहिल्यानगर- बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आणणाऱ्या राहुरी पोलिस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांचा विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे (नाशिक परिक्षेत्र) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की राहुरी पोलिस पथकाने २८ जून … Read more

जनता आपल्या कष्टातून कर भरते, त्यातूनच शासनाची तिजोरी चालते त्यामुळे अधिकाऱ्यांनी पारदर्शक सेवा द्यावी- आमदार आशुतोष काळे

कोपरगाव- जनता आपल्या कष्टातून कर भरते आणि त्या कराच्या माध्यमातून शासनाची तिजोरी भरली जाते. याच करावर शासन यंत्रणा चालते, त्यामुळे प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याने ही बाब लक्षात घेऊन पारदर्शक आणि तत्पर सेवा देणे आवश्यक आहे. प्रशासन आणि जनतेमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी महसूल दिनानिमित्त कोपरगाव … Read more

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेस सरकारचा खोटेपणा उघड, अहिल्यानगर भाजपच्या वतीने न्यायालयाच्या निकालाचे स्वागत

अहिल्यानगर- मालेगाव शहरात २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट घटनेत तत्कालीन काँग्रेसच्या सरकारने निष्पापांना अडकवत मोठा अन्याय केला होता. मात्र, न्यायदेवता ही जागृत आहे. त्यामुळेच १७ वर्षांनी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह इतरांची निर्दोष मुक्तता झाली आहे. या निकालामुळे मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी कॉग्रेस राजवटीचा खोटेपणा पुढे आला आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर शहर भाजपचे सरचिटणीस महेश नामदे यांनी … Read more

भंडारदरा जलाशयाच्या शताब्दी महोत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

राहाता- अहील्याबाई नगर परिसरातील उत्तर जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या भंडारदरा जलाशयाच्या शताब्दी महोत्सवासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे धरणाचे संवर्धन, पर्यटनविकास आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीस चालना मिळणार आहे. भंडारदरा धरणास ‘आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय’ असे नाव देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला आहे. यंदा … Read more

Ahilyanagar News : 35 वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह, घटनेचा तपास सुरू

Ahilyanagar News : सोनई जवळील कांगोणी, ता. नेवासा शिवारात हिंगोणी येथील ज्ञानदेव बाळासाहेब खिलारी (वय ३५) यांचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत शिंगणापूर पोलीस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी की, अशोक बाळासाहेब खिलारी, रा. हिंगोणी, ता. नेवासा यांनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात खबर दिली की दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी भाऊ ज्ञानदेव बाळासाहेब खिलारी हा … Read more

राहूरी पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी, दोन वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलीची करण्यात आली सुटका

राहुरी- तालुक्यातील पोलिसांनी अपहरण प्रकरणात मोठे यश मिळवले आहे. तब्बल दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी अखेर ऑपरेशन मुस्कानच्या अंतर्गत सुखरूप मिळून आली आहे. या कौतुकास्पद कामगिरीसाठी राहुरी पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात एकट्या राहुरी पोलिसांनी ७३ हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या परिवाराच्या ताब्यात दिले आहे. गुन्हा दाखल आणि तपासाची … Read more

राहुरी तालुक्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे सरकारी योजनांचा लाभ घेणारा पती-पत्नीला अटक, चार दिवसाची पोलिस कोठडी

राहुरी- राहुरी तालुक्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय योजना मिळवण्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात ताज निसार पठाण व रुबीना ताज पठाण या पती-पत्नींना अटक करण्यात आली आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या या साखळीचा तपास पोलीस करत असून, यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या सहभागाचीही शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की राहुरी पोलीस स्टेशन … Read more

अहिल्यानगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबांना प्रतिक्विंटल १२ हजार रुपयांचा भाव तर पपईला ४ हजार रुपये भाव

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शुक्रवारी विविध फळांची ४८५ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. संत्र्यांना ८ हजार रुपयांपर्यंत, तर पपईला ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. अहिल्यानगर बाजार समितीत डाळिंबांची १९ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची … Read more