श्रीरामपूर शहरात आठवडे बाजारावरून विक्रते आणि बाजारकरूची सुरूय हेळसांड, नगरपालिकेकडे स्वतंत्र जागा नसल्याने बाजाराबाबत संभ्रम

श्रीरामपूर- काल शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास काही विक्रेत्यांनी म्हाडा कॉलनीतील मोकळ्या रस्त्यावर चटया अंथरूण आपले सामान व भाजीपाला मांडण्यास सुरुवात केली. मात्र, जुन्या बाजातळावरही काही बाजारकरूंनी दुकाने थाटल्याची बातमी कानोकान झाल्याने या विक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तर जुन्या बाजारतळावरही चलबिचल सुरू झाली. त्यातच म्हाडातील रहिवाशी असलेल्या काही प्रतिष्ठीतांनी या बाजारकरूंना येथे दुकाने मांडू नका, असा … Read more

बेलापूर येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भामट्यांच्या पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून आवळल्या मुसक्या

श्रीरामपूर- काही दिवसांपूर्वी दोन वेळा कोल्हार चौकातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे संशयीत आरोपी बेलापूर पोलिसांनी बेलापूर ते कान्हेगाव असा सिनेस्टाईल पाठलाग करून शिताफिने ताब्यात घेतले. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की बेलापूर येथील कोल्हार चौकातील इंडिया वन एटीएम दोन वेळा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. एका निळ्या रंगाच्या मारुती गाडीमध्ये आलेल्या काही इसमांनी हे एटीएम फोडण्याचे … Read more

एक रुपयाही खर्च न करता फक्त 15 मिनिटांत सिंकचा ड्रेन करा Unblock, जाणून घ्या जबरदस्त घरगुती उपाय!

घराच्या रोजच्या वापरातील गोष्टींमध्ये एक जरा लहानशी वाटणारी पण खूप डोकेदुखी ठरू शकणारी गोष्ट म्हणजे सिंकचा ड्रेन तुंबणे. तुम्ही भांडी घासत असाल, किंवा बाथरूममध्ये हात धुत असाल, आणि अचानक पाणी खाली न जाता वरती साचायला लागलं तर प्रचंड संताप होतो. अशावेळी पहिलं सुचतं ते म्हणजे प्लंबरला फोन करणं. पण यासाठी वेळ आणि पैसे, दोन्ही खर्च … Read more

नेवासा तालुक्यात रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदाराला ग्रामस्थांनी पकडले, पोलिसांनी केला गुन्हा दाखल

नेवासा- तालुक्यातील वाकडी येथील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातील मोफत रेशन गोण्या बदलून त्या धान्याची काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. या घटनेमुळे वाकडी ग्रामस्थांचे कौतुक होत आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की बुधवार, २३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता वाकडी येथील सरकारी रेशन दुकानातून मोफत वाटपासाठी असलेल्या धान्याच्या गोण्या … Read more

संगमनेर तालुक्यात बेकायदेशीर सुरू असलेल्या कत्तलखान्यावर मध्यरात्री पोलिसांचा छापा, ५५० किलो गोमांस जप्त

संगमनेर- तालुक्यातील कुरण गावात काटवाचा परिसर असलेल्या ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर काल मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून सुमारे ५५० किलो गोमांस आणि इतर साहित्य जप्त केले. या कारवाईत १ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीचे गोमांस तसेच दुचाकी व हत्यारांसह एकूण २ लाख ७ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या … Read more

भारतात कधीकाळी 1 रुपयात मिळायचे 20 किलो गहू, 8 किलो तूप आणि…; ऐकून विश्वास बसणार नाही!

कधीकाळी आपल्या आजी-आजोबांकडून ऐकलेल्या गोष्टी आज स्वप्नवत वाटतात. “5 पैशांना पाव मिळायचा”, “10 पैशात मजेदार खाद्यपदार्थ” किंवा “1 रुपयात संपूर्ण बाजार करून यायचे” हे वाक्य आपल्याला त्या काळाची एक झलक देतात. पण खरंच, त्या काळात 1 रुपयाचं इतकं मोठं मोल होतं की आज त्याची कल्पनाही करणे कठीण आहे. आज जिथे एका रुपयात फारतर प्लास्टिक पिशवी … Read more

महाराष्ट्र राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढले ! किती वाढले सेवानिवृत्तीचे वय ? वाचा सविस्तर

Government Employee

Government Employee : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची मागणी केली जात आहे. खरंतर राज्य शासकीय सेवेतील अ ब आणि क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष इतके आहे. तसेच ड संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे. या व्यतिरिक्त केंद्रीय … Read more

जगात सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा एकमेव खेळाडू, रोनाल्डोची इंस्टाग्राम कमाई ऐकून डोळे पांढरे होतील!

फुटबॉलच्या मैदानावर जसा तो वेगाने धावतो, तसाच त्याचा प्रभाव डिजिटल दुनियेतही प्रचंड आहे. जगभरातील चाहते ज्याच्या प्रत्येक हालचालीकडे डोळे लावून बसलेले असतात, असा खेळाडू म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो. केवळ गोल्ससाठीच नव्हे, तर त्याच्या इंस्टाग्रामवरील एका पोस्टमधून मिळणाऱ्या कमाईसाठीही तो चर्चेत असतो. आणि खरंच, या आकड्यांविषयी माहिती मिळाल्यावर तुम्हीही थक्क होणार, हे निश्चित! वयाच्या जवळपास 40 व्या … Read more

कर्मफळदाता शनिदेवाच्या प्रिय आहेत ‘या’ जन्मतारखा, वयाच्या 30 नंतर फळतं नशीब! हा भाग्यवान मूलांक तुमचा तर नाही?

आपल्या जन्मतारखेत लपलेलं भविष्य कुणाला उत्सुक करत नाही? भारतीय परंपरेतील अंकशास्त्र म्हणजे केवळ एक प्राचीन शास्त्र नाही, तर आपल्या जीवनाची दिशा ठरवणारा अद्भुत मंत्र आहे. यात प्रत्येक अंकाच्या मागे एक विशिष्ट ग्रह, त्याची ऊर्जा, आणि त्यातून घडणारी व्यक्तिमत्त्वाची छाया असते. या सर्वांमध्ये एक अंक असा आहे ज्याच्यावर शनिदेवांचा विशेष आशीर्वाद असतो, तो म्हणजे अंक 8. … Read more

अहिल्यानगर येथील एन-९५ मास्क पुरवठा व्यवहारात फसवणूक प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय

अहिल्यानगर : येथील अवनप्रितिसिंग गोधरा व सचिन प्रकाश काटे यांच्या मध्ये एक लाख विशिष्ट दर्जाचे एन-९५ मास्क पुरवठा करण्याचा करार झाला होता.या प्रकरणात आरोपीने ५३ लाख ९५ हजार ६४१ रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केला. या विरोधात गोधरा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अँड. अक्षय चौधरी यांच्यामार्फत फौजदारी अर्ज दाखल केला. … Read more

श्रीरामपूरहून पुण्याला मोटारसायकलवर निघालेल्या मायलेकाला बिबट्याची धडक, धडकेत दोघेही जखमी

श्रीरामपूर- आंबी येथून पुण्याला जाण्याकरिता पहाटे निघालेल्या मायलेकाच्या मोटरसायकलला बिबट्याची धडक बसल्यामुळे दोघेही जखमी झाले असून त्यांचेवर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने दोघेही सुखरूप आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, आंबी येथील अलका भगवान वायदंडे (वय ४५) व त्यांचा मुलगा विशाल भगवान वायदंडे (वय २८) हे पुणे येथे जाण्याकरिता सकाळी साडेपाच … Read more

घरमालकाची मनमानी कशाला सहन करता?, प्रत्येक भाडेकरूंना ‘हे’ 10 कायदेशीर हक्क माहीत असायलाच हवे!

आजच्या धकाधकीच्या जगात शहरांमध्ये भाड्याने घर घेणं ही अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. नोकरी, शिक्षण, व्यवसाय अशा वेगवेगळ्या गरजांमुळे अनेक जण आपलं गाव सोडून नवीन ठिकाणी स्थलांतर करतात. अशा वेळी घर मिळणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच घरमालकाशी सुसंवाद साधणं आणि कायदेशीर हक्कांचं भान ठेवणं आवश्यक ठरतं. कारण अनेकदा भाड्याने राहताना काही जण घरमालकाच्या मनमानीला बळी … Read more

महायुती सरकारमुळे पुरोगामी महाराष्ट्राची अधोगतीकडे वाटचाल, तर हाणामारी करणाऱ्या गुंडाना सरकारकडून संरक्षण- मा.आमदार बाळासाहेब थोरात

संगमनेर-महायुती सरकार हे केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले असून, त्यांच्या चुकीच्या कारभारामुळे महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू झाली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटी सदस्य आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना केली. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत महिलांना २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती, परंतु अद्याप कोणालाही याचा लाभ मिळालेला नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत आश्वासने … Read more

संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र निझर्णेश्वर देवस्थानच्या विकासाला चालना देणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रतिपादन

संगमनेर- तिर्थक्षेत्र आणि निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून श्रीक्षेत्र निझर्णेश्वर देवस्थानच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले जात आहे. भाविक व पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता या परिसराचे आध्यात्मिक आणि नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. श्रावण महिन्याच्या निमित्ताने ना. राधाकृष्ण विखे पाटील व शालिनीताई विखे पाटील यांनी निझर्णेश्वर … Read more

सावता महाराजांनी समतेचा आणि प्रेमाचा संदेश दिला, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांचे प्रतिपादन

जेऊर- श्री संत शिरोमणी सावता महाराजांनी भक्ती, सामाजिक समता आणि प्रेमाचा संदेश दिला असल्याचे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केले आहे. जेऊर येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त त्रिदिनी कीर्तन महोत्सवा बरोबर विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी बोलताना अक्षय कर्डिले यांनी सांगितले की, संत सावता महाराजांचे कार्य जगाला प्रेरणादायी ठरणारे आहे. … Read more

नेवासा तालुक्यातील एकही लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नाही, आमदार लंघे यांची ग्वाही

नेवासा- शहरातील एकही पात्र लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिला. नेवासा नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीनंतर धनादेशाचे वाटप आमदार लंघे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आ. लंघे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर मुख्याधिकारी संतोष लांडगे, भाऊसाहेब वाघ, विजयाताई अंबाडे, डॉ. … Read more

कारमधून निघणाऱ्या धुरामुळे वाढतो डिमेंशियाचा धोका?, नवीन संशोधनात झाला मोठा खुलासा!

कारमधून निघणारा धूर, रस्त्यांवर सतत फिरणारी वाहनं आणि त्या सगळ्यातून तयार होणारं सूक्ष्म कणांचं प्रदूषण हे केवळ डोळ्यांना किंवा फुफ्फुसांनाच नाही, तर थेट मेंदूवर हल्ला करतंय. आणि यामुळं डिमेंशियासारख्या गंभीर मानसिक आजाराचा धोका वाढतोय, असा खुलासा नुकत्याच एका संशोधनातून झाला आहे. डिमेंशिया हा एक असा आजार आहे जो स्मृती आणि मेंदूच्या कामकाजावर हळूहळू परिणाम करतो. … Read more

रस्ते अपघातप्रकरणी अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करा, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मोटार वाहन कायद्यातील नियम अधिक कठोर करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये दुप्पट व तिप्पट दंड, परवाना रद्द करणे यांसारख्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. मात्र या प्रस्तावाला तीव्र विरोध करत ई-चलन विरोधी संघर्ष समितीचे अभय ललवाणी यांनी केंद्रीय मंत्री नितीन … Read more