अहिल्यानगर जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पात ५० टक्क्यांपेेक्षा अधिक पाणीसाठा, जाणून घ्या इतर धरणामध्ये किती आहे पाणीसाठा?

अहिल्यानगर- जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पात सध्या पन्नास टक्क्याहून (१५ टीएमसी) अधिक पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी जुलै महिन्यात अवघा १६ टक्के पाणीसाठा प्रकल्पात होता. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर राहिल्यास यंदा लवकरच कुकडी प्रकल्पातील धरणं ‘ओव्हरफ्लो’ होण्याची शक्यता आहे. यंदा अगदी मे महिन्यापासूनच पावसाचे आगमन झाले आहे, मात्र कुकडी पाणलोट क्षेत्रात … Read more

अहिल्यानगर शहरातील पेमराज सारडा महाविद्यालयात उत्साहात पार पडला भाषा महोत्सव, संस्कृत, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे अनोखे एकत्रीकरण

अहिल्यानगर- सध्या राज्यात भाषांवरून राजकारण पेटलेले असताना पेमराज सारडा महाविद्यालयात संस्कृत, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे अनोखे एकत्रीकरण करत भाषा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील ११ वी व १२ वी मधील विद्यार्थी महोत्सवात सहभागी होत चारही भाषांच्या विविध पैलूंची ओळख करून घेतली. यानिमित्त सभागृहात चारही भाषांच्या भित्तीपत्रकांचे छोटेसे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या … Read more

महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘ही’ प्रलंबित मागणी अखेर पूर्ण

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे राज्यातील खाजगी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत. खरंतर राज्यातील खाजगी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या वर्षी 70 दिवसाहून अधिक काळ वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केली होती. … Read more

सोनं पुन्हा चमकलं ! 19 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ?

Gold Price Today

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत गेल्या दहा दिवसांच्या काळात चांगलीच तेजी राहिली आहे. फक्त 15 आणि 16 जुलैला सोन्याच्या किमतीत घसरण झाली होती. मात्र, इतर सर्व दिवस या मौल्यवान धातूच्या किमती वाढतच होत्या. आज देखील सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे आणि पुन्हा एकदा या मौल्यवान धातूची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली आहे. दहा … Read more

ब्रेकिंग ! आरबीआयकडून महाराष्ट्रातील ‘या’ दोन बड्या बँकांवर कठोर कारवाई, ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण

Banking News

Banking News : देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून देशभरातील बँकांवर नियंत्रण ठेवले जात असते. देशातील सर्वच सरकारी, सहकारी आणि खाजगी बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. बँकांसोबतच एनबीएफसी कंपन्यांना देखील आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते. ज्या बँका नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर आरबीआयकडून कठोर कारवाई देखील केली जाते. आरबीआय कडून … Read more

सरकारच्या योजनांचा लाभ पारधी समाजापर्यंत थेट पोहोचवा, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे निर्दैश

अहिल्यानगर- पारधी समाज व वंचित घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. मात्र अनेकदा या योजनांचा लाभप्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्यांच्या विकासाची गती मंदावते. पारधी समाज तसेच वंचित घटकांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अॅड. गोरक्ष लोखंडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत ते … Read more

अहिल्यानगर शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पूर्णाकृती पुतळ्याचे २७ जुलैला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार भूमिपूजन

अहिल्यानर- शहरातील माळीवाडा वेस येथे उभारण्यात येणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित पुतळा उभारणीच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले कृती समितीच्या वतीने झालेल्या बैठकीत हा पुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन २७ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संध्याकाळी ५ वाजता होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तर हा कार्यक्रम फक्त माळी समाजापुरता मर्यादीत … Read more

सायकलवर घराकडे निघालेल्या इसमाचा कोल्हार पुलावर ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू, ट्रकचालक फरार

कोल्हार- कोल्हारच्या पुलावर ट्रकखाली चिरडून सायकस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. ट्रक चालक घटनेनंतर पसार झाला आहे. सलीम बाबू शेख ( वय ६३ रा. अंबिकानगर, कोल्हार) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या फळ विक्रेत्याचे नांव आहे. काल दुपारी चारच्या सुमारास मयत सलीम शेख आपल्या सायकलवरून कोल्हार खुर्द कडे जात असताना आर जे १९ … Read more

संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागील खरा काटेरी सुत्रधार कोण आहे हे ओळखा- माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर- संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे केवळ काटे नव्हे, तर खरे ‘काटेरी’ सूत्रधार कोण आहेत, हे ओळखण्याचे आवाहन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. गुन्हेगार कोणताही असो, त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी जोरदारपणे मांडली. संगमनेर बसस्थानक येथे आयोजित निषेध आंदोलनात छात्र भारती, राष्ट्रसेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बहुजन … Read more

अहिल्यानगरमध्ये पती-पत्नीच्या किरकोळ वादातून पतीने छातीवर वार करत केली आत्महत्या तर पत्नीनेही मारली इमारतीवरून उडी

अहिल्यानगर- पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यात वादातून पतीने स्वतः छातीत चाकूने वार करून घेत आत्महत्या केली. पत्नीनेही घराच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना एमआयडीसीजवळील गजानन कॉलनी येथे वडगाव गुप्ता रस्त्यावर गुरूवारी दि. १७रोजी रात्री घडली. अनिल ध्रुव खरवाल (वय २६) असे मयताचे नाव असून, … Read more

बनावट ॲपच्या माध्यमातून कोट्यावधींचा घोटाळा केल्याप्रकरणी शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांवर होणार कारवाई?

सोनई- शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांना मुंबई येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नोटीस बजावली असून, दिनांक २५ जुलै रोजी मुंबईत उपस्थित राहून म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी दिनांक १८ जुलै रोजी विश्वस्त मंडळाच्या वतीने वकीलांनी कार्यालयात उपस्थित राहून पुढील तारखेची विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर २५ जुलै ही पुढील सुनावणीची तारीख देण्यात आली आहे. आमदार … Read more

सोयाबीन पिकावर औषध व्यवस्थीत का मारले नाही असे विचारल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यात घातला कोयता, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला

अहिल्यानगर- शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचे दिसल्याने औषध व्यवस्थित का मारले नाही, असे विचारल्याच्या रागातून तिघांनी त्याच्या कोयत्याने हल्ला केला. ही घटना १७ जुलै रोजी सकाळी घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नवनाथ सूर्यभान नाटक, गीताराम सूर्यभान नाटक व अन्य दोघांचा संशयित आरोपीमध्ये समावेश आहे. याबाबत भानुदास सूर्यभान नाटक (वय … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमधून धावणार नवीन रेल्वेगाडी ! 20 जुलैपासून सुरु होईल, राज्यातील कोण-कोणत्या स्थानकावर थांबा ? पहा…

Maharashtra Railway

Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. 20 जुलै 2025 पासून रेल्वे प्रशासनाकडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की रेल्वे प्रशासनाने काचीगुडा ते भगत कि कोठी यादरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलेला होता. या विशेष एक्सप्रेस ट्रेनमुळे उत्तर आणि दक्षिण भारताला एक चांगली … Read more

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा राहुरी तालुक्यातील मावा-तंबाखू विक्रेत्यांवर छापा, १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने राहुरी तालुक्यातील वांबोरी भागातील मावा व सुगंधीत तंबाखू विक्रेत्यांवर छापा घालून एक लाख ४६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वांबोरी येथील मावाचा कारखाना उद्ध्वस्त केला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात दोघाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल ऊर्फ पिनू गोरक्षनाथ जाधव (वय ३०, रा. वांबोरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यास … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील जलजीवन योजनेत मोठा भ्रष्टाचार, खासदार भाऊसाहेब वाकचौरे व नीलेश लंके यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

अहिल्यानगर- जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचार आणि अहिल्यानगर शहरातील अमृत फेज-२ योजनेच्या दिरंगाईवरून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दिशा समितीची बैठक वादळी ठरली. खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि नीलेश लंके यांनी अधिकाऱ्यांना कसून जाब विचारत या प्रकरणांना लोकसभेच्या अधिवेशनात उपस्थित करण्याची घोषणा केली. जलजीवन योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आणि अमृत फेज-२ योजनेत ठेकेदाराला अनावश्यक मुदतवाढ दिल्याचा गंभीर … Read more

‘हे’ आहेत भारतातील सर्वात मोठे टॉप 5 Malls, यादीत महाराष्ट्रातील किती मॉल्स आहेत ?

India's Top Malls

India’s Top Malls : शॉपिंग हा आपल्यापैकी अनेकांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय. भारतात शॉपिंग साठी आपल्याला वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतात. स्ट्रीट शॉपिंग पासून ते मोठमोठ्या मॉल्स पर्यंत इथे सार काही अवेलेबल आहे. पारंपारिक हस्तकलेपासून ते उच्च दर्जाच्या लक्झरी ब्रँडपर्यंत सर्वकाही आपल्याला इथं मिळत. आपल्या देशात आवडीनुसार आणि बजेटनुसार बाजारपेठा, मॉल्स आणि शॉपिंग स्ट्रीट्सची अविश्वसनीय विविधता … Read more

इंडिया किंवा फक्त हिंदुस्थानच नव्हे, तब्बल 12 नावांनी ओळखला जातो भारत देश! फक्त बुद्धिमान लोकांनाच माहित असतील ही प्राचीन नावे

आपण ज्या देशात जन्मलो, तो केवळ ‘इंडिया’ किंवा ‘भारत’ या दोनच नावांनी ओळखला जात नाही, तर त्याच्या नावांचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. विविध संस्कृती, धर्म, परदेशी सम्राट, लेखक आणि संत-महंत यांच्या उल्लेखांमधून भारताची एकूण 12 नावे उदयास आली आहेत. ही नावे केवळ उच्चारासाठी नाहीत, तर ती त्या त्या काळातील भारताच्या ओळखीचा, संस्कृतीचा आणि संपत्तीचा ठसा … Read more

भारताची नवी रणनीती! सिंधू, झेलम, चिनाब नदीवरील ‘हा’ प्रकल्प पाकिस्तानला हादरवणार

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. कधी सीमारेषेवर तणाव, कधी राजकीय संघर्ष तर कधी पाण्यासारख्या नैसर्गिक संसाधनांवरून वाद. पण यंदा भारताने एक असा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे पाकिस्तानच्या अस्वस्थतेला नवा उच्चांक मिळाला आहे. पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित करून पाकिस्तानला स्पष्ट संदेश … Read more