श्रीगोंद्यात अवकाळी पावसामुळे विटांचा झाला चिखल! वीटभट्टी चालकांचे लाखोंचे नुकसान तर कामगारांवर उपासमारीची वेळ!

Ahilyanagar News:श्रीगोंदा- तालुक्यात सोमवारी (१२ मे) पहाटे झालेल्या अवकाळी पावसाने वीटभट्टी मालक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कामगारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या पावसामुळे कच्च्या विटांचा चिखल झाला, तसेच माल आणि साहित्य भिजून नासले. यामुळे वीटभट्टी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संकटातून सावरण्यासाठी वीटभट्टी मालक माऊली कुंभार यांनी … Read more

श्रीरामपूरमध्ये साठवण तलाव फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान, कांदाचाळीत घुसले पाणी

Ahilyanagar News: श्रीरामपूर- शहरातील भैरवनाथ नगर परिसरात नगरपालिकेचा दोन नंबर साठवण तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तलावातील पाणी शेतात आणि कांदा चाळीत शिरल्याने पिकांचे नुकसान झाले, विशेषतः कांदा भिजल्याने तो साठवणुकीसाठी योग्य राहिला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. सरपंच दीपाली फरगडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मुख्याधिकारी … Read more

पाथर्डीत वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना तडाखा! घरावरील पत्रे उडाले, कांदा आणि आंब्याचे प्रचंड नुकसान

Ahilyanagar News: पाथर्डी- बुधवारी (७ मे २०२५) दुपारी पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. जोरदार वादळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांवरील पत्रे उडून गेले, आणि त्यांचे संसार उघड्यावर आले. कांदा आणि आंबा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोहोज देवढे गावच्या सरपंच अरुणा रावसाहेब देवढे यांनी महसूल विभागाकडे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना … Read more