अहमदनगर :- नगर शहरातील वसंतटेकडी येथील जलकुंभावर टँकरमध्ये पाणी भरत असतांना टँकरवर चढलेला कर्मचारी घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
विलास उर्फ सखाराम नारायण कराळे (वय ५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी (दि.२७) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.


याबाबत सविस्तर माहिती अशी कि मनपाच्या वतीने खासगी संस्थेमार्फत शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
सोमवारी सायंकाळी वसंतटेकडी येथे जलकुंभावर टँकरमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू असतांना या संस्थेच्या टँकरवरील कर्मचारी कराळे हा टँकरवर चढला होता.
यावेळी तोल जावून घसरून पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच तो मयत झाल्याचे सांगण्यात आले.
- प्रतीक्षा संपली ! मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मुहूर्त ठरला, ‘या’ तारखेला धावणार Bullet Train
- ब्रेकिंग ! केंद्र पाठोपाठ ‘या’ राज्यात स्थापित झाला आठवा वेतन आयोग, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- मुंबई ते नाशिक प्रवास होणार वेगवान ! तयार होणार १३१ Km लांबीचा नवा रेल्वेमार्ग, या गावांमधून जाणार नवा मार्ग
- ……तर राज्यातील 45 लाख लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा लाभ मिळणार नाही ! नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच फडणवीस सरकारचा दणका
- ब्रेकिंग ! नव्या वर्षात मुंबईसह महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी, महाराष्ट्रात किती दिवस राहणार पावसाचे सावट?