कोपरगाव : तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील विवाहितेने वस्तीवरील कांद्याच्या चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी पूजा मयूर नाईक (वय २०, रा. ब्राह्मणगाव) या विवाहितेने त्यांच्या वस्तीवरील कांद्याच्या चाळीत गुरुवारी (दि. २९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी सुनील अरविंद नाईक यांनी पोलिसांत खबर दिली. यावरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास मुख्य हवालदार आंधळे करीत आहेत.
- महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवीन Railway मार्ग ! 100 मिनिटाचा प्रवास फक्त 60 मिनिटात; कसा असणार रूट ?
- पुणेकरांसाठी खुशखबर ! ‘या’ शहरासाठी चालवली जाणार नवीन सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट ?
- Banking News: तुम्ही HDFC बँकेचे खातेधारक आहात का? तर पटकन वाचा 4 ऑक्टोबर पासून बदलणारा ‘हा’ नियम
- अहिल्यानगर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा रणसंग्राम सुरु ! प्रभाग रचना जाहीर ! आता तुमचा भाग कुठे गेला ? जाणून घ्या
- अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी आरक्षण निश्चित, जाणून घ्या कुठे काय आहे आरक्षण













