बेळगाव : वडील आपल्याला पबजी खेळू देत नाहीत, याचा राग आल्याने चिडलेल्या एका निर्दयी मुलाने चक्क जन्मदात्या वडिलांवर हल्ला चढवत त्यांचे तुकडे करून हत्या केली आहे. ही घटना सोमवारी पहाटे कर्नाटकातील बेळगावधील काकती येथे घडली आहे.
याप्रकरणी रघुवीर कुंभार नामक तरुणास अटक केली आहे.कर्नाटकातील बेळगावमधील काकती येथे असलेल्या सिध्देश्वरनगरात सोमवारी पहाटे ही घटना घडली आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत रघुवीर पबजी गेम खेळत बसला होता. यावेळी वडिलांनी त्याला मोबाईल ठेव असा सल्ला दिला.

परंतु यानंतरही तो हा गेम खेळतच राहिला. तेव्हावडिलांनी त्याच्याकडील मोबाईल फोन हिसकावून घेतला. यानंतर रागाच्या भरातच रघुवीर झोपण्यासाठी गेला. त्याने प्रथम आई झोपलेल्या खोलीच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावली आणि तिला कोंडले.
यानंतर घरात असलेल्या विळ्याने वडिलांवर हल्ला चढवला. त्याचा राग इतका अनावर झाला होता की त्याने रागाच्या भारत वडिलांचे तीन तुकडे केले. मृत वडिलांचे नाव शंकर देवाप्पा कुंभार असल्याचे कळते.रघुवीर हा पॉलिटेक्निकचा विद्यार्थी होता.
त्याचे शिक्षणात लक्ष लागत नव्हते. मोबाईल गेमच्या सवयीमुळे तो तीन वेळा नापास झाला होता. यामुळे आई-वडील खूप दु:खी होते. रघुवीरचे वडील पोलीस दलातून तीन महिन्यांपूर्वीच निवृत्त झालेले होते. रघुवीर हा सतत नापास होत असल्याने बेरोजगार होता.
त्यामुळे तो घरीच बसून मोबाईलवर गेम खेळत असे. अशातच वडीलही सेवानिवृत झाले होते. तेही घरी बसून रहात, तेव्हा त्यांना मुलगा फक्त गेम खेळताना दिसायचा. यावरून अनेकदा मुलगा आणि वडिलांत भांडणेही होत होती. या भांडणाचा शेवट सोमवारी वडिलांच्या हत्येने झाला आहे.
- Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीवर मिळतोय मोठा डिस्काउंट ! ‘या’ तारखेपासून सुरु होणार सिक्रेट ऑफर्स
- महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवीन Railway मार्ग ! 100 मिनिटाचा प्रवास फक्त 60 मिनिटात; कसा असणार रूट ?
- लाडक्या बहिणींसाठी CM फडणवीस यांची मोठी घोषणा ! योजनेचा ऑक्टोबर हप्ता कधी मिळणार ? वाचा…
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! कर्मचारी व पेन्शन धारकांना मिळणार ‘हे’ आर्थिक लाभ
- वाईट काळ संपणार ! आता ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार













