पुणे :- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी गोहत्यांबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारत कृषी गोसेवा संघ पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.
या वेळी राजे शिवराय प्रतिष्ठानचे शिवाजी खरात, विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्ष विभागाचे शिवांकुर खेर, योगेश शेटे, मानद पशु कल्याण अधिकारी गोरक्षण विभागाचे शिवशंकर स्वामी आदी उपस्थित होते. एकबोटे म्हणाले,’ गोहत्येला प्रोत्साहन देणारे वक्तव्य दानवेंसारख्या जबाबदार व्यक्तीने करणे योग्य नाही.

त्यांच्या या वक्तव्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची भावना आहे. याबाबत दानवेंचा निषेध करण्यासाठी गुरुवारी दुपारी ४ वाजता जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौकात आंदोलन करण्यात येणार आहे.
- ‘या’ जन्मतारखेचे लोक असतात दोन चेहऱ्यांचे, बोलण्यात पटाईत पण विश्वास ठेवताना सावध राहा! जाणून घ्या त्यांचा खरा स्वभाव
- नागीणचे लक्षणे दिसताच तातडीने ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर होऊ शकतो गंभीर त्रास!
- आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय? आता एसटी थेट तुमच्या गावात येणार; तुम्हाला घेऊन जाणार अन् माघारीही आणून सोडणार
- व्हेजच्या नावाखाली फसवणूक; ‘या’ शाकाहारी पदार्थांतही असते मांस, जिलेटिन आणि अंडी!
- विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी! पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ, अर्ज करण्यासाठी ‘ही’ असणार आहे शेवटची तारीख