अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले असून २००५ची पुनरावृत्ती होते
की काय, अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे. शहरातील बाजारपेठ ,खेर्डीमध्ये पाच फुटापेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे.

गेले आठ दिवस पडणाऱ्या पावसाने बुधवारी मध्यरात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यात जोर धरला. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजला. या पावसाचा सर्वाधिक फटका चिपळूण शहराला बसला.
चिपळूण : चिपळूण कोव्हिड सेंटरला पाण्याने घेरले असून या रुग्णालयात काही कोरोना रुग्ण अडकले असल्याची माहिती मिळत आहे. साधारण २१ रुग्णांचे जीव धोक्यात असल्याचे बोलले जात आहे.
ऑक्सिजनचा पुरवठा ही बंद झाला असून रुग्णवाहिका ही वाहून गेली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच २१ रुग्णांसोबत संपर्कही होत नसल्याची माहिती मिळाली आहे. गेले आठ दिवस पडणाऱ्या पावसाने बुधवारी मध्यरात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यात जोर धरला.
त्यामुळे गुरुवारी संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजला. या पावसाचा सर्वाधिक फटका चिपळूण शहराला बसला. चिपळूण शहर जलमय झाले. फूणगुस, कसबा, चांदेराई, नावडी, राजापूर शहर, खेड शहराचा काही भाग पाण्यात गेला होता.
जगबुडी, बावनदी, मुचकुंदी, सोनवी, शास्त्री, गडनदी या नद्यांच्या धोक्याची पातळी ओलांडली. मुंबई- गोवा महामार्ग आणि चिपळूण- कराड मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम