व्वा क्या बात हे…भारताने पूर्ण केला १५० कोटी लसीकरणाचा टप्पा

Ahilyanagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी देशात लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. यातच देशाने १५० कोटी लसीकरणाचा टप्पा काल पार केला.

प्रभावी लसीकरण मोहीम देशातल्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात राबवल्याने आपण हा टप्पा गाठू शकलो.

याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांचे आभार तर मानलेच पण त्यांना एक आवाहनही केलं आहे. पंतप्रधान मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, कोरोना विरूद्धच्या या लढाईतला एक मोठा टप्पा देशाने आता पार केला आहे.

`लसीकरण आघाडीवर एक उल्लेखनीय दिवस! १५० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल आमच्या देशवासीयांचे अभिनंदन. आमच्या लसीकरण मोहिमेमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.

पुढे बोलताना मोदी म्हणाले, त्याच वेळी, आपण सर्व कोविड-१९ संबंधित प्रोटोकॉलचे पालन करत राहू या. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी काम करणाऱ्या सर्वांचे भारत आभारी आहे.

आम्ही आमचे डॉक्टर, शास्त्रज्ञ, नवोदित आणि लोकांचे लसीकरण करणार्‍या आरोग्य सेवा कर्मचार्‍यांचे आभार मानतो. मी सर्व पात्र नागरिकांना लस टोचून घेण्याचे आवाहन करतो. चला एकत्र, कोविड-१९ चा सामना करूया.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe