अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- मागील पाच वर्षात रस्ते विकासाचा निर्माण झालेला मोठा अनुशेष भरून काढण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी दोनच वर्षांत महाविकास आघाडी सरकारकडून रस्त्यांसाठी ९५ कोटींचा निधी आणला.
त्यामुळे वाड्या वस्त्यांच्या रस्त्यांपासून मुख्य रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, पाच वर्ष ज्यांच्याकडे सर्व प्रकारची सत्ता हातात असताना देखील ज्यांच्याकडून नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत.

त्यांना व त्यांच्या अर्धवट कार्यकर्त्यांना आमदार आशुतोष काळे करीत असलेला विकास कधीच दिसणार नाही, अशी टीका कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी भाजप तालुकाध्यक्ष रोहोम यांच्यावर केली.
कोपरगाव ते सावळीविहीर रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी केंद्रीय रस्ते, वाहतूक, दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने केलेला पाठपुरावा व या रस्त्यासाठी येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेले प्रयत्न कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेला माहित आहे.
मात्र, ज्यांच्या काळात या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणे मतदार संघातील जनतेला अपेक्षित होते, त्यांच्याकडून हा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे त्यांना जनतेने २०१९ च्या निवडणुकीत घरी बसवले तेच आमच्यामुळे या रस्त्यासाठी निधी मिळाल्याचे सांगत श्रेय घेण्यासाठी आटापिटा करीत आहेत.
ज्यावेळी सिन्नर, शिर्डी, अहमदनगर, दौंड, बारामती, पैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडीपर्यंत (राष्ट्रीय महामार्ग) एनएच १६० मंजूर करण्यात आला.
त्याचवेळी राहाता तालुक्यातील सावळीविहीर फाटा ते सेंधवा (म.प्र.) पर्यंत या रस्त्यासाठी (राष्ट्रीय महामार्ग) एनएच ७५२ जी असा क्रमांक देण्यात आला व काही दिवसातच एनएच १६० चे प्रत्यक्षात काम देखील सुरू झाले होते.
मात्र, दुसरीकडे एनएच ७५२ जी हा राष्ट्रीय महामार्ग एनएचएआयकडे हस्तांतरीत देखील करण्यात आला नव्हता. त्यामुळे या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून फक्त नामोल्लेख होत होता, असेही सुधाकर रोहोम यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम