RBI Repo Rate hike : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) रेपो रेटमध्ये (Repo Rate) बदल करण्यात आला आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. RBI च्या या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना झटका बसला आहे.
RBI ने रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. या वाढीनंतर रेपो दर 4.40 टक्क्यांवरून 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरबीआयच्या या कवायतीमुळे सर्वसामान्यांचा ईएमआयचा बोजा वाढणार आहे.

सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल
आरबीआयच्या वतीने रेपो रेट वाढवल्याचा फटका बँकांच्या करोडो ग्राहकांना बसणार आहे. रेपो दरात वाढ झाल्याने बँकांकडून ग्राहकांना दिले जाणारे कर्ज (Loan) महाग होणार आहे. वाढत्या व्याजदराचा परिणाम ईएमआयवर होणार आहे. ग्राहकांचा ईएमआय पूर्वीच्या तुलनेत वाढेल.
वर्षाला 11000 रुपयांचा बोजा वाढणार आहे
एका गणनेनुसार, जर तुम्ही 20 वर्षांसाठी गृहकर्ज घेतले (Home loan) असेल. आतापर्यंत, जर तुमच्या गृहकर्जाचा व्याजदर 7.20 टक्के होता, तर आता तो 7.70 टक्के होण्याची शक्यता आहे.
तुम्ही 30 लाखांच्या कर्जावर सध्याच्या व्याज दराने 20 वर्षांसाठी 23,620 रुपये प्रति महिना EMI भरत आहात. परंतु व्याजदरात 0.50 टक्के वाढ झाल्याने हा EMI 24536 रुपयांपर्यंत वाढेल. म्हणजेच आता तुम्हाला दर महिन्याला 916 रुपये अधिक द्यावे लागतील. यानुसार, तुम्हाला दरवर्षी सुमारे 10992 रुपये अधिक द्यावे लागतील.
रेपो दर म्हणजे काय?
RBI कडून बँकांना ज्या दराने कर्ज दिले जाते त्याला रेपो दर म्हणतात. रेपो दरात वाढ झाली म्हणजे बँकांना RBI कडून जास्त दराने कर्ज मिळेल. यामुळे गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याजदर अधिक होतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या EMI वर होईल.